शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

पुढील अनेक वर्षे देशात भाजपाचंच वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही, प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 11:46 IST

Prashant Kishor News: लोक Narendra Modi यांना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण BJP कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.

नवी दिल्ली - राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपाची ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. भाजपा येणाऱ्या अनेक दशकांमध्ये भारतीय राजकारणात एक प्रबल शक्ती म्हणून कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपाविरोधात अनेक दशके लढावे लागेल. ४० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे काँग्रेस सत्तेचे केंद्र राहिली होती. त्याचप्रमाणे भाजपा हरो अथावा जिंको ती सत्तेच्या केंद्रामध्ये कायम राहील. जेव्हा एखादा पक्ष ३० टक्के मते मिळवतो तेव्हा तो राजकारणाच्या केंद्रातून लवकर हटत नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

एका कार्यक्रमात संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की, लोक मोदींना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण भाजपा कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.

यावेळी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींबाबतही मोठे विधान केले आहे, ते म्हणाले की, याबाबतीत राहुल गांधींची एक अडचण आहे. कदाचित  काही काळातच जनता नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवेल, असे त्यांना वाटते. मात्र असे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना हरवण्यासाठी प्रतिकार करू शकणार नाही. बहुतांश लोक त्यांची ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाही आहे. अशी कोणती बाब आहे जी त्यांना लोकप्रिय बनवत आहे, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकणार नाहीत.

किशोर पुढे म्हणाले की, तुम्ही कुठल्याही काँग्रेस नेत्याशी किंवा प्रादेशिक नेत्याशी जाऊन बोललात तर ते सांगणार की आता केवळ काही वेळेचीच बाब आहे. लोक मोदींवर नाराज आहेत. सत्ताविरोधी लाट येईल आणि जनता त्यांना सत्तेतून बाहेर काढेल, पण असे होणार नाही.

व्होटर बेस पाहिला तर ही लढाई एक तृतियांश आणि दोन तृतियांशामधील आहे. केवळ एक तृतियाश लोक भाजपाला मत देतात. मात्र उर्वरित दोन तृतियांश मतदार एवढा विखुरलेला आहे की, तो १०,१२ किंवा १५ राजकीय पक्षांमध्ये विभाजित आहे आणि हेच काँग्रेसच्या पतनाचे मुख्य कारण आहे. काँग्रेसला असलेला जनतेचा पाठिंबा कमी कमी होत गेला आहे. ६५ टक्के जनाधार विखुरला आहे. त्यामुळे अनेल लहान लहान पक्ष तयार झाले आहेत.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा