शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

पुढील अनेक वर्षे देशात भाजपाचंच वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही, प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 11:46 IST

Prashant Kishor News: लोक Narendra Modi यांना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण BJP कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.

नवी दिल्ली - राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपाची ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. भाजपा येणाऱ्या अनेक दशकांमध्ये भारतीय राजकारणात एक प्रबल शक्ती म्हणून कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपाविरोधात अनेक दशके लढावे लागेल. ४० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे काँग्रेस सत्तेचे केंद्र राहिली होती. त्याचप्रमाणे भाजपा हरो अथावा जिंको ती सत्तेच्या केंद्रामध्ये कायम राहील. जेव्हा एखादा पक्ष ३० टक्के मते मिळवतो तेव्हा तो राजकारणाच्या केंद्रातून लवकर हटत नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

एका कार्यक्रमात संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की, लोक मोदींना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण भाजपा कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.

यावेळी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींबाबतही मोठे विधान केले आहे, ते म्हणाले की, याबाबतीत राहुल गांधींची एक अडचण आहे. कदाचित  काही काळातच जनता नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवेल, असे त्यांना वाटते. मात्र असे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना हरवण्यासाठी प्रतिकार करू शकणार नाही. बहुतांश लोक त्यांची ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाही आहे. अशी कोणती बाब आहे जी त्यांना लोकप्रिय बनवत आहे, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकणार नाहीत.

किशोर पुढे म्हणाले की, तुम्ही कुठल्याही काँग्रेस नेत्याशी किंवा प्रादेशिक नेत्याशी जाऊन बोललात तर ते सांगणार की आता केवळ काही वेळेचीच बाब आहे. लोक मोदींवर नाराज आहेत. सत्ताविरोधी लाट येईल आणि जनता त्यांना सत्तेतून बाहेर काढेल, पण असे होणार नाही.

व्होटर बेस पाहिला तर ही लढाई एक तृतियांश आणि दोन तृतियांशामधील आहे. केवळ एक तृतियाश लोक भाजपाला मत देतात. मात्र उर्वरित दोन तृतियांश मतदार एवढा विखुरलेला आहे की, तो १०,१२ किंवा १५ राजकीय पक्षांमध्ये विभाजित आहे आणि हेच काँग्रेसच्या पतनाचे मुख्य कारण आहे. काँग्रेसला असलेला जनतेचा पाठिंबा कमी कमी होत गेला आहे. ६५ टक्के जनाधार विखुरला आहे. त्यामुळे अनेल लहान लहान पक्ष तयार झाले आहेत.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा