शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

झारखंडमध्ये भाजपच बहुमताने सरकार स्थापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 06:12 IST

झारखंडमधील जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करणार

रांची : झारखंडमधील जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केला.

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार मिळून राजकीय अस्थिरता अनुभवलेल्या झारखंडचा सर्वांगीण विकास होईल. या राज्याच्या विकासासाठी भाजपकडे दृष्टिकोन आहे. केंद्र आणि राज्यात सारखेच सरकार असेल, तर विकास करणे अधिक सुलभ होते, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी कामगिरीचा हवाला देत रुडी म्हणाले की, भाजपने आदिवासी समुदायाच्या विकासासाठी, पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी आणि कृषी क्षेत्राच्या वृद्धीसाठी काम केले. झारखंडला राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला, तेव्हा मीसुद्धा या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. स्वतंत्र राज्यनिर्मितीनंतर मात्र दुर्दैवाने अनेक वर्षे या राज्यात राजकीय स्थिरता नव्हती.

मधू कोडा यांच्या २००६ ते २००८ या कार्यकाळाचा संदर्भ देत रुडी म्हणाले की, तत्त्वहीन पक्षाची व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याचे राज्याने पाहिले. मागची पाच वर्षे भाजपने स्थिर सरकार दिले. यावेळीही झारखंडची जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करील. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप तत्त्व आणि धोरणानुसार काम करते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019ElectionनिवडणूकBJPभाजपा