शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

झारखंडमध्ये भाजपच बहुमताने सरकार स्थापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 06:12 IST

झारखंडमधील जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करणार

रांची : झारखंडमधील जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केला.

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार मिळून राजकीय अस्थिरता अनुभवलेल्या झारखंडचा सर्वांगीण विकास होईल. या राज्याच्या विकासासाठी भाजपकडे दृष्टिकोन आहे. केंद्र आणि राज्यात सारखेच सरकार असेल, तर विकास करणे अधिक सुलभ होते, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी कामगिरीचा हवाला देत रुडी म्हणाले की, भाजपने आदिवासी समुदायाच्या विकासासाठी, पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी आणि कृषी क्षेत्राच्या वृद्धीसाठी काम केले. झारखंडला राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला, तेव्हा मीसुद्धा या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. स्वतंत्र राज्यनिर्मितीनंतर मात्र दुर्दैवाने अनेक वर्षे या राज्यात राजकीय स्थिरता नव्हती.

मधू कोडा यांच्या २००६ ते २००८ या कार्यकाळाचा संदर्भ देत रुडी म्हणाले की, तत्त्वहीन पक्षाची व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याचे राज्याने पाहिले. मागची पाच वर्षे भाजपने स्थिर सरकार दिले. यावेळीही झारखंडची जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करील. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप तत्त्व आणि धोरणानुसार काम करते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019ElectionनिवडणूकBJPभाजपा