शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

बिहारमध्ये भाजपला हवी परमिटवर दारू; गुजरात पॅटर्न राबविण्याची सुशील मोदी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:12 IST

बिहारमधील दारूबंदीबाबतच्या कायद्यात वारंवार केल्या जाणाऱ्या दुरुस्तीबाबत भाजपचे राज्यसभा सदस्य सुशीलकुमार मोदी यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: बिहारमधील दारूबंदीबाबतच्या कायद्यात वारंवार केल्या जाणाऱ्या दुरुस्तीबाबत भाजपचे राज्यसभा सदस्य सुशीलकुमार मोदी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. या वेळी त्यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना बिहारमध्ये गुजरातच्या धर्तीवर परमिटवर दारू दिली जावी, असेही म्हटले आहे.

सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे की, मी नेहमी दारूबंदी कायद्याच्या बाजूने आहे. परंतु, मागील ६ वर्षांत वारंवार दारूबंदी कायद्यात दुरुस्ती करताना हा कायदा दलित-आदिवासी व मागासवर्गाच्या विरोधात केला असल्याचे सांगितले जाते. गुजरातप्रमाणे बिहारमध्येही परमिटवर दारू मिळाली पाहिजे. बिहारमध्ये दारूबंदी कायदा मोठ्या लोकांना दिलासा देणारा कायदा झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राज्य सरकारवर आरोप करताना त्यांनी म्हटले आहे की, श्रीमंत माणसे वाहनात दारू मिळाल्यावर आता विमा रकमेच्या ५० टक्क्यांऐवजी १० टक्के दंड देऊन सुटू शकतात. हा बदल श्रीमंतांच्या बाजूने नाही का? एखादा गरीब माणूस दारू प्याल्यानंतर पकडला गेल्यास तो दंडाची रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे तो जेलमध्ये जातो.

सांगा, किती जणांना मदत मिळाली?

सुशील मोदी यांचे म्हणणे आहे की, विषारी दारूमुळे मरणाऱ्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने भाजपच्या दबावातून घेतलेला आहे. परंतु, नियमावली अशी तयार केली आहे की, आता ही मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. विषारी दारूमुळे राज्यात ५०० जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी किती जणांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळाली, हे आधी सरकारने सांगावे. आजवर एकाही दोषीला शिक्षा का मिळाली नाही?

 

टॅग्स :BJPभाजपा