शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:43 IST

'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर ९ लाख जवान तिथे कशासाठी हवेत?'

श्रीनगर: निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर होत असल्याचा आरोप जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केला आहे. भाजपाला जवानांची आणि काश्मिरींची कोणतीही चिंता नसल्याचंदेखील मुफ्ती म्हणाल्या. काश्मीरमधून कलम ३७० काढल्यानंतर मुफ्ती नजरकैदेत आहेत.  मेहबूबा मुफ्ती नदरकैदेत असल्यानं त्यांची कन्या इल्तिजा त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळते. इल्तिजा यांनी मेहबूबा यांच्या वतीनं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. 'भाजपाकडून जवानांचा वापर होत आहे. जवानांचं शौर्य आणि त्यांचा त्याग मतांसाठी वापरला जात आहे. काश्मीर खोऱ्यातील अशांतता कायम राखण्यासाठी जवानांना प्यादं बनवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांना काश्मिरींची आणि जवानांची चिंता नाही. त्यांना केवळ निवडणुका जिंकण्यात रस आहे,' असं ट्विट मुफ्तींच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.  लष्कराचा वापर आंदोलकांना भिडण्यासाठी नव्हे, तर सीमांचं संरक्षण करण्यासाठी व्हायला हवा, असंदेखील मुफ्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर मग इथे ९ लाख जवान काय करत आहेत? ते पाकिस्तानकडून होणारे हल्ले परतवण्यासाठी नव्हे, तर आंदोलकांना चिरडण्यासाठी काश्मीरमध्ये आहेत. आंदोलन मोडून काढणं हे लष्कराचं काम नाही. सीमांचं संरक्षण करणं ही लष्कराची जबाबदारी आहे,' अशा शब्दांमध्ये मुफ्तींनी भाजपा सरकावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान