शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

'मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:43 IST

'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर ९ लाख जवान तिथे कशासाठी हवेत?'

श्रीनगर: निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून जवानांचा प्याद्यांसारखा वापर होत असल्याचा आरोप जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केला आहे. भाजपाला जवानांची आणि काश्मिरींची कोणतीही चिंता नसल्याचंदेखील मुफ्ती म्हणाल्या. काश्मीरमधून कलम ३७० काढल्यानंतर मुफ्ती नजरकैदेत आहेत.  मेहबूबा मुफ्ती नदरकैदेत असल्यानं त्यांची कन्या इल्तिजा त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळते. इल्तिजा यांनी मेहबूबा यांच्या वतीनं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. 'भाजपाकडून जवानांचा वापर होत आहे. जवानांचं शौर्य आणि त्यांचा त्याग मतांसाठी वापरला जात आहे. काश्मीर खोऱ्यातील अशांतता कायम राखण्यासाठी जवानांना प्यादं बनवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांना काश्मिरींची आणि जवानांची चिंता नाही. त्यांना केवळ निवडणुका जिंकण्यात रस आहे,' असं ट्विट मुफ्तींच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.  लष्कराचा वापर आंदोलकांना भिडण्यासाठी नव्हे, तर सीमांचं संरक्षण करण्यासाठी व्हायला हवा, असंदेखील मुफ्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'काश्मीरमधील परिस्थिती निवळली असेल, तर मग इथे ९ लाख जवान काय करत आहेत? ते पाकिस्तानकडून होणारे हल्ले परतवण्यासाठी नव्हे, तर आंदोलकांना चिरडण्यासाठी काश्मीरमध्ये आहेत. आंदोलन मोडून काढणं हे लष्कराचं काम नाही. सीमांचं संरक्षण करणं ही लष्कराची जबाबदारी आहे,' अशा शब्दांमध्ये मुफ्तींनी भाजपा सरकावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान