शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

स्थलांतरितांच्या मुद्यावरून भाजपमध्ये आहे अस्वस्थता; भाजप अध्यक्ष नड्डांनी केली मंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:42 IST

नड्डा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही; पण स्थलांतरितांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

नवी दिल्ली : स्थलांतरित लोकांची हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये टीव्ही चॅनल्सवर सध्या दिसत आहेत. या मुद्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी बैठकांचे सत्र घेतले.नड्डा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही; पण स्थलांतरितांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.स्थलांतरित लोकांसाठी पक्षाकडून निवारा शिबिरात भोजन आणि अन्य सुविधा दिल्या जात आहेत. दरम्यान, पक्षाचे उपाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य ओम प्रकाश माथूर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेले एक पत्र लीक झाले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माथूर यांनी यात स्थलांतरित कामगारांचे काही मुद्दे उपस्थित करण्याची हिंमत दाखविली आहे. स्थलांतरित कामगारांच्या परिवहनासाठी पीएम केअर्स फंडमधून १००० कोटी रुपये खर्च केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे आमचे आपले लोक आहेत, असेही त्यांनी यात म्हटले आहे.प्रक्रिया सोपी कराएका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही पक्ष नेतृत्वाला हे सांगितले आहे की, स्थलांतरितांना आॅनलाईन फॉर्म भरण्याची त्रासदायक प्रक्रिया शिबिरात नोडल अधिकारी नेमून सोपी करावी.स्थलांतरित लोकांना स्वीकारण्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नकार दिला होता. याबाबत भाजपने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. बिहार सरकारमधील काही मंत्र्यांनी आवाज उठविला आणि केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केल्यानंतर श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे चालू दिल्या.माथूर यांच्या पत्राने मात्र पक्ष नेतृत्वाची चिंता वाढविली; पण परिस्थिती योग्य न हातळल्याबद्दल त्यांनी कुणाला दोषी धरले नाही. त्यांनी केवळ हा मुद्दा उपस्थित केला.या मुद्यावर नेते अस्वस्थ आहेत, हा संदेश यातून गेला. त्यांनी राज्यातील अंतर्गत राजकारणावरही बोट ठेवले. दरम्यान, एक असाही प्रस्ताव आहे की, रेल्वे आता प्रवाशांसाठी मोफत फेऱ्या करील आणि १०० टक्के सबसिडी देऊ शकते.

टॅग्स :j. p. naddaजे. पी. नड्डाBJPभाजपा