शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

स्थलांतरितांच्या मुद्यावरून भाजपमध्ये आहे अस्वस्थता; भाजप अध्यक्ष नड्डांनी केली मंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:42 IST

नड्डा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही; पण स्थलांतरितांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

नवी दिल्ली : स्थलांतरित लोकांची हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये टीव्ही चॅनल्सवर सध्या दिसत आहेत. या मुद्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी बैठकांचे सत्र घेतले.नड्डा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही; पण स्थलांतरितांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.स्थलांतरित लोकांसाठी पक्षाकडून निवारा शिबिरात भोजन आणि अन्य सुविधा दिल्या जात आहेत. दरम्यान, पक्षाचे उपाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य ओम प्रकाश माथूर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेले एक पत्र लीक झाले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माथूर यांनी यात स्थलांतरित कामगारांचे काही मुद्दे उपस्थित करण्याची हिंमत दाखविली आहे. स्थलांतरित कामगारांच्या परिवहनासाठी पीएम केअर्स फंडमधून १००० कोटी रुपये खर्च केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे आमचे आपले लोक आहेत, असेही त्यांनी यात म्हटले आहे.प्रक्रिया सोपी कराएका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही पक्ष नेतृत्वाला हे सांगितले आहे की, स्थलांतरितांना आॅनलाईन फॉर्म भरण्याची त्रासदायक प्रक्रिया शिबिरात नोडल अधिकारी नेमून सोपी करावी.स्थलांतरित लोकांना स्वीकारण्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नकार दिला होता. याबाबत भाजपने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. बिहार सरकारमधील काही मंत्र्यांनी आवाज उठविला आणि केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केल्यानंतर श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे चालू दिल्या.माथूर यांच्या पत्राने मात्र पक्ष नेतृत्वाची चिंता वाढविली; पण परिस्थिती योग्य न हातळल्याबद्दल त्यांनी कुणाला दोषी धरले नाही. त्यांनी केवळ हा मुद्दा उपस्थित केला.या मुद्यावर नेते अस्वस्थ आहेत, हा संदेश यातून गेला. त्यांनी राज्यातील अंतर्गत राजकारणावरही बोट ठेवले. दरम्यान, एक असाही प्रस्ताव आहे की, रेल्वे आता प्रवाशांसाठी मोफत फेऱ्या करील आणि १०० टक्के सबसिडी देऊ शकते.

टॅग्स :j. p. naddaजे. पी. नड्डाBJPभाजपा