शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:35 IST

भाजप बिहार प्रदेश मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी अधिकृत पत्र जारी करत या कारवाईची माहिती दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातील ४ नेत्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. एनडीएच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आणि पक्षविरोधी कारवाईत सहभागी असल्याचा आरोप करत भाजपने ही मोठी कारवाई केली आहे.

शिस्तभंग करणाऱ्यांना कठोर संदेश -भाजप बिहार प्रदेश मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी अधिकृत पत्र जारी करत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित नेत्यांनी पक्षाचे धोरण आणि पक्षाच्या नियांचे उल्लंघन करून एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. "आपले हे कृत्य पक्षविरोधी असून, यामुळे संघटनेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. शिस्तभंंगाची ही घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही," असे शर्मा यांनी पत्रात नमूद केले आहे.

कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांची नावे -- १. पवन यादव (कहलगांव विधानसभा)२. वरुण सिंह (बहादुरगंज)३. अनूप कुमार श्रीवास्तव (गोपालगंज)४. सूर्य भान सिंह (बडहरा)

या सर्व नेत्यांनी एनडीएच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

बंडखोरी खपवून घेतली जाणार नाहीत -अरविंद शर्मा यांनी म्हटले आहे की, "भाजप एक अतिशय शिस्तबद्ध संघटना आहे, संघटनेची विचारधारा आणि हित हे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा नेहमीच अधिक महत्त्वाचे मानले जाते." महत्वाचे म्हणजे, तिकीट वाटपाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांमध्ये असंतोष दिसत आहे. अनेक बंडखोर नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी भाजपने तातडीने कठोर भूमिका घेत, पक्षाच्या शिस्तीपेक्षा कोणीही मोठे नाही आणि बंडखोरीला थारा दिला जाणार नाही, असा एक स्पष्ट संदेश दिला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या कारवाईच्या माध्यमाने भाजपने निवडणुकीपूर्वीच पक्षातील इतर असंतुष्ट नेत्यांनाही इशारा दिला आहे. निवडणुकीच्या काळात केवळ एनडीएचे अधिकृत उमेदवारच पक्षाचा चेहरा असतील, हे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Expels Four Leaders Amid Bihar Election Turmoil for Rebellion

Web Summary : Amid Bihar elections, BJP expelled four leaders for six years for contesting against NDA candidates and anti-party activities. The party emphasized discipline and warned against rebellion, signaling unity ahead of polls.
टॅग्स :BJPभाजपाBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024