शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 11:00 IST

LAC: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे.

ठळक मुद्देभाजप खासदाराचा दावाचीन तर पुढे आणखी पुढे सरकतोय!LAC वर केवळ भारतच माघारी फिरला

नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये लडाख सीमेवर अद्यापही तणाव असल्याचे संकेत दिले जात आहेत. अलीकडेच प्रचंड थंडी आणि बदलत्या हवामानामुळे चीनचे सैन्य माघारी जात असल्याचे सांगितले गेले. या पार्श्वभूमीवर भाजपच्याच एका खासदाराने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे. (bjp subramanian swamy says he realizes only india withdrew from lic after ladakh confrontation) 

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर देशाची अंतर्गत संरक्षण आणि परकीय मुद्द्यांवरून सातत्याने टीका करताना दिसत आहेत. यातच आता स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारला चीनच्या हालचालींपासून सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मला समजले की, लडाख येथे ज्या ठिकाणी संघर्ष झाला, तेथून केवळ भारतीय सैन्य मागे हटले. मात्र, चीनचे सैन्य तेथेच असून ते पुढे आले, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. 

“अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल”; कपिल सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला सूचक इशारा

चीन तर पुढे आणखी पुढे सरकतोय

सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करत एका युझरने ट्विटरवर म्हटले आहे की, संघर्षाच्या एक वर्षानंतरही भारत आणि चीनमधील संघर्ष कमी व्हायला हवा. तसेच या युझरने एक रिपोर्ट शेअर केला असून, यामध्ये भारत आणि चीनमधील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर, सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली असून, खरच का? परराष्ट्र मंत्रालयाने सर्व परत गेल्याचे जाहीर केले होते. आता मला समजतंय की, केवळ भारत माघारी आला असून, चीन आणखी पुढे सरकतोय, असे स्वामी म्हणाले. 

“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद

चीनविरोधात कठोर कारवाई करावी

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही अनेकदा चीनविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. चीनकडून भारत आणि भूतान यांच्या भूभागावर कब्जा केला जात आहे. यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. घाबरून चीनला चोख प्रत्युत्तर देणे भविष्यात महागात पडू शकते, असा इशारा स्वामी यांनी दिला होता. 

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो; राकेश टिकैत संतापले

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये भारतीय सीमेवर चिनी सैनिकांची पुरती वाट लागली आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने चिनी सैनिकांचे पाय लडखडू लागले आहे. या थंडीने प्रकृती बिघडल्यामुळे पिपल्स लिबरेशन आर्मीने एलएसीवर तैनात ९० टक्के सैनिकांना माघारी बोलावले आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे नंतरच्या तणावामुळे चीनने भारतीय सीमा क्षेत्रात ५० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले होते. चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास ९० टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत. त्यांनाही वातवरणाशी जुळवून घेणे जड जात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार