शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 11:00 IST

LAC: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे.

ठळक मुद्देभाजप खासदाराचा दावाचीन तर पुढे आणखी पुढे सरकतोय!LAC वर केवळ भारतच माघारी फिरला

नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये लडाख सीमेवर अद्यापही तणाव असल्याचे संकेत दिले जात आहेत. अलीकडेच प्रचंड थंडी आणि बदलत्या हवामानामुळे चीनचे सैन्य माघारी जात असल्याचे सांगितले गेले. या पार्श्वभूमीवर भाजपच्याच एका खासदाराने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे. (bjp subramanian swamy says he realizes only india withdrew from lic after ladakh confrontation) 

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर देशाची अंतर्गत संरक्षण आणि परकीय मुद्द्यांवरून सातत्याने टीका करताना दिसत आहेत. यातच आता स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारला चीनच्या हालचालींपासून सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मला समजले की, लडाख येथे ज्या ठिकाणी संघर्ष झाला, तेथून केवळ भारतीय सैन्य मागे हटले. मात्र, चीनचे सैन्य तेथेच असून ते पुढे आले, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. 

“अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल”; कपिल सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला सूचक इशारा

चीन तर पुढे आणखी पुढे सरकतोय

सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करत एका युझरने ट्विटरवर म्हटले आहे की, संघर्षाच्या एक वर्षानंतरही भारत आणि चीनमधील संघर्ष कमी व्हायला हवा. तसेच या युझरने एक रिपोर्ट शेअर केला असून, यामध्ये भारत आणि चीनमधील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर, सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली असून, खरच का? परराष्ट्र मंत्रालयाने सर्व परत गेल्याचे जाहीर केले होते. आता मला समजतंय की, केवळ भारत माघारी आला असून, चीन आणखी पुढे सरकतोय, असे स्वामी म्हणाले. 

“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद

चीनविरोधात कठोर कारवाई करावी

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही अनेकदा चीनविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. चीनकडून भारत आणि भूतान यांच्या भूभागावर कब्जा केला जात आहे. यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. घाबरून चीनला चोख प्रत्युत्तर देणे भविष्यात महागात पडू शकते, असा इशारा स्वामी यांनी दिला होता. 

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो; राकेश टिकैत संतापले

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये भारतीय सीमेवर चिनी सैनिकांची पुरती वाट लागली आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने चिनी सैनिकांचे पाय लडखडू लागले आहे. या थंडीने प्रकृती बिघडल्यामुळे पिपल्स लिबरेशन आर्मीने एलएसीवर तैनात ९० टक्के सैनिकांना माघारी बोलावले आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे नंतरच्या तणावामुळे चीनने भारतीय सीमा क्षेत्रात ५० हजारांहून अधिक सैनिक तैनात केले होते. चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास ९० टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत. त्यांनाही वातवरणाशी जुळवून घेणे जड जात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार