शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

पश्चिम बंगालमधील पराभवामुळे राज्यातील भाजप बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:42 IST

‘ऑपरेशन लोटस’च्या प्रयत्नांना बसला मोठा धक्का

यदु जोशी

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विजय मिळाल्यानंतर भाजप महाराष्ट्रात ''ऑपरेशन लोटस'' करून सत्ता आणेल असा तर्क दिला जात होता. मात्र तिकडे कमळ कोमेल्याने महाराष्ट्रातील ऑपरेशनलाही मोठा धक्का बसला आहे. असे असले तरी पंढरपूरच्या विजयाने भाजपला बळ दिले आहे.‘पंतप्रधान मोदी आणि विशेषत: फोडाफोडीचे राजकारण करून सत्तासमीकरणे बदलण्याची ताकद राखणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात व्यग्र आहेत. बंगालचा गड एकदा सर केला की ते महाराष्ट्रात लक्ष घालतील’ असे भाजपचे राज्यातील नेते खासगीत सांगत होते.  ‘सगळी तयारी झाली; फक्त मुहूर्ताची वाट पाहणे सुरू आहे, २ मे नंतर मुहूर्त निघेल’ , असा दावादेखील केला जात होता पण बंगालमध्ये सत्तास्वप्न धुळीस मिळाल्याने आता लगेच महाराष्ट्रात सत्तेसाठीचे ऑपरेशन करण्याची भाजपच्या श्रेष्ठींची मानसिकता नसेल असे मानले जात आहे.

भाजपचा वारू काही प्रादेशिक पक्षांनी रोखून धरला. ओडिशात नवीन पटनाईक यांनी तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपला रोखून धरले आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत चमत्कार केला. राजकीय जाणकारांच्या मते बंगालमध्ये भाजपचा विजय झाला असता तर देशाच्या इतर राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना फोडाफोडीच्या राजकारणाद्वारे कमकुवत करण्याची खेळी भाजपकडून नक्कीच खेळली गेली असती. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गळ टाकण्याची योजना होती. 

पवार, पाटील यांना धक्कामहाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष एकत्र आणि सोबत सहानुभूतीचा फॅक्टर असे अनुकूल चित्र असतानाही भालके यांचा पराभव झाला. प्रचाराची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादीला उभारी  n या विजयात राष्ट्रवादी वा शिवसेनेचा कोणताही वाटा नसला तरी याने राष्ट्रवादी, शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांना नक्कीच उभारी मिळणार आहे.राष्ट्रवादीला पंढरपूरच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे लागेल. n ममता यांच्या मदतीने प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याचे प्रयत्न शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होवू शकतात. मात्र, या पराभवाने महाविकास आघाडीत परस्परांविषयी शंकेचे वातावरण निर्माण होऊ शकते. भाजप त्याचा फायदा कसा घेऊ शकेल, हे पहायचे.

भाजप नेत्यांना आत्मविश्वास

n या पराभवाने राष्ट्रवादीलाच नव्हे तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विरोधात तीन पक्ष अन् सहानुभूती हे फॅक्टर एकत्र आले तरी आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्वास या विजयाने भाजपजनांना दिला आहे. n ‘पंढरपूरमध्ये तुम्ही यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रचारसभेत म्हणाले होते. n बंगालमधील भाजपच्या पराभवाने महाविकास आघाडी सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी नवा मुहूर्त शोधण्याची वेळ भाजपवर येऊ शकते. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा