शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:27 IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिर सोहळ्याला काँग्रेस नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अवघे काही दिवस राहिले असल्याने लगबगीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्यांना आमंत्रणे पोहोचली आहेत. यावरून विरोधक सातत्याने केंद्रावर टीका करताना दिसत आहेत. यातच आता काँग्रेस पक्ष राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली असून, काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला, या शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे. 

काँग्रेसने जाहीर केले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी राम मंदिर अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण 'आदरपूर्वक नाकारत' आहे. भाजप आणि आरएसएस निवडणूक फायद्यासाठी याचा वापर करत आहेत. हा एक राजकीय कार्यक्रम बनविण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. मीडियाशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला

काँग्रेसचा प्रभू रामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्षाने न्यायालयात कागदपत्रे सादर करताना म्हटले होते की, प्रभू श्रीरामांचे काहीच अस्तित्व नाही, याची आठवण स्मृती इराणी यांनी करून दिली. अयोध्येतील राम मंदिरात होणारा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्म, आस्था या दृष्टिकोनातून भाविकांसाठी, रामभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली यांनी म्हटले आहे की, काँग्रेस अधिकृतपणे सांगत आहे की, त्यांचे वरिष्ठ नेते २२ जानेवारीला अयोध्येत नसतील, यात आश्चर्य वाटायला नको. कारण गेल्या काही दशकांत काँग्रेसने असे एकही पाऊल उचलले नाही की, ज्यावरून असे म्हणता येईल की, त्यांना अयोध्येत मंदिर बांधायचे आहे. यूपीए सरकारने प्रभू रामाचे अस्तित्व नाकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी असे त्यांना कधीच वाटले नाही. आता तिथे मंदिर बांधले गेल्याने ते अयोध्येला जाणार नसल्याचे सांगत आहेत. तेथे मंदिर बांधावे असे त्यांना कधीच वाटले नाही, अशी टीका करण्यात आली. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणी