शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

“काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:27 IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिर सोहळ्याला काँग्रेस नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अवघे काही दिवस राहिले असल्याने लगबगीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्यांना आमंत्रणे पोहोचली आहेत. यावरून विरोधक सातत्याने केंद्रावर टीका करताना दिसत आहेत. यातच आता काँग्रेस पक्ष राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली असून, काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला, या शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे. 

काँग्रेसने जाहीर केले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी राम मंदिर अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण 'आदरपूर्वक नाकारत' आहे. भाजप आणि आरएसएस निवडणूक फायद्यासाठी याचा वापर करत आहेत. हा एक राजकीय कार्यक्रम बनविण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. मीडियाशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला

काँग्रेसचा प्रभू रामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्षाने न्यायालयात कागदपत्रे सादर करताना म्हटले होते की, प्रभू श्रीरामांचे काहीच अस्तित्व नाही, याची आठवण स्मृती इराणी यांनी करून दिली. अयोध्येतील राम मंदिरात होणारा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्म, आस्था या दृष्टिकोनातून भाविकांसाठी, रामभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली यांनी म्हटले आहे की, काँग्रेस अधिकृतपणे सांगत आहे की, त्यांचे वरिष्ठ नेते २२ जानेवारीला अयोध्येत नसतील, यात आश्चर्य वाटायला नको. कारण गेल्या काही दशकांत काँग्रेसने असे एकही पाऊल उचलले नाही की, ज्यावरून असे म्हणता येईल की, त्यांना अयोध्येत मंदिर बांधायचे आहे. यूपीए सरकारने प्रभू रामाचे अस्तित्व नाकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी असे त्यांना कधीच वाटले नाही. आता तिथे मंदिर बांधले गेल्याने ते अयोध्येला जाणार नसल्याचे सांगत आहेत. तेथे मंदिर बांधावे असे त्यांना कधीच वाटले नाही, अशी टीका करण्यात आली. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणी