शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:52 IST

'राहुल गांधींना भारतात बांग्लादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती आणायची आहे. '

BJP Slams Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज(दि.18) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन विविध मतदारांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आता भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, 'राहुल गांधी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आणि जनतेच्या नाकारण्यामुळे निराश झाले आहेत. त्यामुळेच ते फक्त आरोप करतात, पण सिद्ध करण्याची वेळ येते, तेव्हा पळून जातात.'

खोटे आरोप करण्याची सवयअनुराग ठाकूर पुढे म्हणतात, 'राहुल गांधींना खोटे आणि निराधार आरोप करण्याची सवय लागली आहे. निवडणूक आयोग त्यांच्या आरोपांची पडताळणी करण्यास सांगते आणि प्रतिज्ञापत्र देण्यास सांगते, तेव्हा ते मागे हटतात. आरोप करून नंतर माफी मागणे आणि न्यायालयाकडून फटकारे खाणे हे त्यांचे नेहमीचे काम झाले आहे. आळंद मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर, 2023 मध्ये मतदारसंघातून नावे वगळण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. निवडणूक आयोगाने स्वतः या संदर्भात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने आधीच मोबाईल नंबर आणि आयपी अॅड्रेस दिले. या सर्वानंतर काँग्रेसशासित कर्नाटकच्या सीआयडीने आतापर्यंत काय केले? आळंद विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारच जिंकला होता. मग काँग्रेस मते चोरून जिंकली का?' असा प्रश्न ठाकेर यांनी केला. 

हायड्रोजन बॉम्बऐवजी फुलबाजी'ते पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, परंतु त्यांना फुलबाजीवर काम भागवावे लागले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जवळपास ९० निवडणुका हरल्या आहेत, त्यामुळेच त्यांची निराशा वाढत आहे. त्यांना भारतात बांग्लादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती आणायची आहे. राहुल गांधींनी स्वतः पत्रकार परिषदेत कबूल केले की, ते लोकशाही वाचवण्यासाठी येथे नाहीत. जर लोकशाही वाचवायची नसेल, तर ती नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय आहे का? टूलकिटची मदत घेऊन ते सतत आपल्या संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात,' असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला.

ही दिवाळखोरी आहे: संजय सेठकेंद्रीय मंत्री संजय सेठ म्हणाले, 'ही दिवाळखोरी आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुम्ही एका संवैधानिक संस्थेला दोष देत आहात. तुमचा ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, ईव्हीएम किंवा जनतेवर विश्वास नाही. म्हणूनच देशातील जनता तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. तुम्हाला तिसऱ्यांदा बाजूला करण्यात आले, त्यामुळे तुम्ही तुमची निराशा निवडणूक आयोगावर काढत आहात. देशातील जनता तुम्हाला पुन्हा बाजूला करेल.'

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग