शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:52 IST

'राहुल गांधींना भारतात बांग्लादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती आणायची आहे. '

BJP Slams Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज(दि.18) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन विविध मतदारांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आता भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, 'राहुल गांधी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आणि जनतेच्या नाकारण्यामुळे निराश झाले आहेत. त्यामुळेच ते फक्त आरोप करतात, पण सिद्ध करण्याची वेळ येते, तेव्हा पळून जातात.'

खोटे आरोप करण्याची सवयअनुराग ठाकूर पुढे म्हणतात, 'राहुल गांधींना खोटे आणि निराधार आरोप करण्याची सवय लागली आहे. निवडणूक आयोग त्यांच्या आरोपांची पडताळणी करण्यास सांगते आणि प्रतिज्ञापत्र देण्यास सांगते, तेव्हा ते मागे हटतात. आरोप करून नंतर माफी मागणे आणि न्यायालयाकडून फटकारे खाणे हे त्यांचे नेहमीचे काम झाले आहे. आळंद मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर, 2023 मध्ये मतदारसंघातून नावे वगळण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. निवडणूक आयोगाने स्वतः या संदर्भात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने आधीच मोबाईल नंबर आणि आयपी अॅड्रेस दिले. या सर्वानंतर काँग्रेसशासित कर्नाटकच्या सीआयडीने आतापर्यंत काय केले? आळंद विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारच जिंकला होता. मग काँग्रेस मते चोरून जिंकली का?' असा प्रश्न ठाकेर यांनी केला. 

हायड्रोजन बॉम्बऐवजी फुलबाजी'ते पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, परंतु त्यांना फुलबाजीवर काम भागवावे लागले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जवळपास ९० निवडणुका हरल्या आहेत, त्यामुळेच त्यांची निराशा वाढत आहे. त्यांना भारतात बांग्लादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती आणायची आहे. राहुल गांधींनी स्वतः पत्रकार परिषदेत कबूल केले की, ते लोकशाही वाचवण्यासाठी येथे नाहीत. जर लोकशाही वाचवायची नसेल, तर ती नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय आहे का? टूलकिटची मदत घेऊन ते सतत आपल्या संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात,' असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला.

ही दिवाळखोरी आहे: संजय सेठकेंद्रीय मंत्री संजय सेठ म्हणाले, 'ही दिवाळखोरी आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुम्ही एका संवैधानिक संस्थेला दोष देत आहात. तुमचा ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, ईव्हीएम किंवा जनतेवर विश्वास नाही. म्हणूनच देशातील जनता तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. तुम्हाला तिसऱ्यांदा बाजूला करण्यात आले, त्यामुळे तुम्ही तुमची निराशा निवडणूक आयोगावर काढत आहात. देशातील जनता तुम्हाला पुन्हा बाजूला करेल.'

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग