शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

भाजपाला राममंदिर हवे, तर वटहुकूम काढावा - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 4:11 AM

अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यात चालढकल केली तर केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारे रामंदिरासाठी उत्सुक नाहीत, असा त्याचा अर्थ होईल, असेही ते म्हणाले.‘तुम्हाला राममंदिर बांधायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा, मग आम्ही ते बांधू’, असा भाजपाला इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी स्वत: अयोध्येला जायचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खासदार राऊत बोलत होते. अयोध्येत राममंदिर उभे राहणे हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. करोडो लोकांची ती मनापासूनची भावना आहे. याच भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भाजपा सत्तेत आली आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांमधील तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी सरकारला वटहुकमाचा मार्ग अनुसरता येतो. मग राम मंदिरासाठी तोच मार्ग अनुसरताना सरकार का मागे हटते?न्यायालयातील प्रकरण लवकर संपून राममंदिर बांधले जाईल, असे काही दिसत नाही. वटहुकूम आणला तर लोकसभेत १०० हून अधिक व राज्यसभेतही बरेच भाजपेतर खासदार त्यास पाठिंबा देतील.या प्रकरणाचा निर्णय २०१९ पर्यंतच व्हायला हवा. त्यानंतर राममंदिर व बाबरी मशीद हा विषय कोणत्याही पक्षाचा अजेंडा असता कामा नये किंवा त्यावर निवडणुकाही लढविल्या जाऊ नयेत. आम्हाला श्रेय नको. ते तुम्ही घ्या; पण राममंदिर बांधा. -संजय राऊत, राज्यसभा सदस्य, शिवसेना

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत