शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपाला राममंदिर हवे, तर वटहुकूम काढावा - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 04:13 IST

अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यात चालढकल केली तर केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारे रामंदिरासाठी उत्सुक नाहीत, असा त्याचा अर्थ होईल, असेही ते म्हणाले.‘तुम्हाला राममंदिर बांधायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा, मग आम्ही ते बांधू’, असा भाजपाला इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी स्वत: अयोध्येला जायचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खासदार राऊत बोलत होते. अयोध्येत राममंदिर उभे राहणे हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. करोडो लोकांची ती मनापासूनची भावना आहे. याच भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भाजपा सत्तेत आली आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांमधील तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी सरकारला वटहुकमाचा मार्ग अनुसरता येतो. मग राम मंदिरासाठी तोच मार्ग अनुसरताना सरकार का मागे हटते?न्यायालयातील प्रकरण लवकर संपून राममंदिर बांधले जाईल, असे काही दिसत नाही. वटहुकूम आणला तर लोकसभेत १०० हून अधिक व राज्यसभेतही बरेच भाजपेतर खासदार त्यास पाठिंबा देतील.या प्रकरणाचा निर्णय २०१९ पर्यंतच व्हायला हवा. त्यानंतर राममंदिर व बाबरी मशीद हा विषय कोणत्याही पक्षाचा अजेंडा असता कामा नये किंवा त्यावर निवडणुकाही लढविल्या जाऊ नयेत. आम्हाला श्रेय नको. ते तुम्ही घ्या; पण राममंदिर बांधा. -संजय राऊत, राज्यसभा सदस्य, शिवसेना

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत