शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

भाजपाला राममंदिर हवे, तर वटहुकूम काढावा - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 04:13 IST

अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यात चालढकल केली तर केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारे रामंदिरासाठी उत्सुक नाहीत, असा त्याचा अर्थ होईल, असेही ते म्हणाले.‘तुम्हाला राममंदिर बांधायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा, मग आम्ही ते बांधू’, असा भाजपाला इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी स्वत: अयोध्येला जायचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खासदार राऊत बोलत होते. अयोध्येत राममंदिर उभे राहणे हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. करोडो लोकांची ती मनापासूनची भावना आहे. याच भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भाजपा सत्तेत आली आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांमधील तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी सरकारला वटहुकमाचा मार्ग अनुसरता येतो. मग राम मंदिरासाठी तोच मार्ग अनुसरताना सरकार का मागे हटते?न्यायालयातील प्रकरण लवकर संपून राममंदिर बांधले जाईल, असे काही दिसत नाही. वटहुकूम आणला तर लोकसभेत १०० हून अधिक व राज्यसभेतही बरेच भाजपेतर खासदार त्यास पाठिंबा देतील.या प्रकरणाचा निर्णय २०१९ पर्यंतच व्हायला हवा. त्यानंतर राममंदिर व बाबरी मशीद हा विषय कोणत्याही पक्षाचा अजेंडा असता कामा नये किंवा त्यावर निवडणुकाही लढविल्या जाऊ नयेत. आम्हाला श्रेय नको. ते तुम्ही घ्या; पण राममंदिर बांधा. -संजय राऊत, राज्यसभा सदस्य, शिवसेना

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत