शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम; केशव प्रसाद मौर्य यांची योगींवर पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:36 IST

केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात.

राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री योगी आणि राज्यातील दोन उपमुख्यमंत्री यांच्यात राजकीय वाद सुरू आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वालाही हे ठाऊक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यानंतर, उत्तर प्रदेशमध्ये आता सर्व ठीक आहे, असे मानले जात होते. परंतु, सोमवारी भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

नेमके काय म्हणाले...

केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, नेहमी पक्षच निवडणूक लढवतो आणि पक्षच जिंकतो. भाजप सरकारच्या तमाम मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हते की, ते मुख्यमंत्री होणार आहेत. आम्ही सरकारमध्ये नव्हतो तेव्हा जिंकलो. पण, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण