शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

भाजपवर उलटविणार डाव? बंडखोरांना मंत्रिपदाची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 06:29 IST

कर्नाटकी नाट्याला नवे वळण; सर्वच मंत्र्यांचे राजीनामे

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस)यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला.

आमदाराकीचा राजीनामा दिलेले सारे जण मुंबईच्या सोफीटेल हॉटेलात मुक्कामास होते. काँग्रेस व जनता दलाच्या सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले आहेत. तेथून ते कर्नाटकात परतणार की, सरकार पडेपर्यंत तिथेच थांबणार, हे स्पष्ट झालेले नाही. विधानसभाध्यक्ष रमेश कुमार उद्या, मंगळवारी या आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ते कदाचित उद्या बंगळुरूला जातील, असा अंदाज आहे.दोन्ही पक्षांच्या १३ बंडखोर आमदारांना मंत्री करता यावे, यासाठीच सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही बंडखोर राजीनाम्याचा फेरविचार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्यांनी असे करू नये, यासाठीच भाजप नेत्यांनी त्यांना गोव्यात नेण्याचा निर्णय घेतला, असे समजते.

कर्नाटक मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा निर्णय उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सिद्धरामय्या, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामीयांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळातच सरकारमधील जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. काँग्रेसच्या मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे दिले, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

काँग्रेसचे एक मंत्री रहीम मेहमूद खान यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ असे ते म्हणाले होते. पण नंतर सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने परिस्थिती बदलली आहे.आमचा संबंध नाही - भाजपकर्नाटकमध्ये भाजपमुळेच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत केला.

मात्र संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोप फेटाळला. ते म्हणाले की, आमचा तेथील घटनांशी काहीचसंबंध नाही. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामादिल्यानंतर कर्नाटकमध्ये तशाच साऱ्या घटना घडत आहेत अशी उपरोधिक टीकाही राजनाथसिंह यांनी केली. (वृत्तसंस्था)‘लवकरच फेरबदल’कर्नाटकामध्ये लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील, असे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले. राज्यातील घडामोडींची भीती वाटत नसल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेतून पतरल्यानंतर त्यांनी सांगितले की, जे काही चालले आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. भाजप जे काही करत आहे, त्याच्याशी मला कर्तव्य नाही. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडण्यावर माझे लक्ष आहे. आमदारांच्या राजीनाम्याबाबत विचारता, त्यांनी बघू या काय होते ते, असे उत्तर त्यांनी दिले.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामी