शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भाजपवर उलटविणार डाव? बंडखोरांना मंत्रिपदाची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 06:29 IST

कर्नाटकी नाट्याला नवे वळण; सर्वच मंत्र्यांचे राजीनामे

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस)यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला.

आमदाराकीचा राजीनामा दिलेले सारे जण मुंबईच्या सोफीटेल हॉटेलात मुक्कामास होते. काँग्रेस व जनता दलाच्या सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले आहेत. तेथून ते कर्नाटकात परतणार की, सरकार पडेपर्यंत तिथेच थांबणार, हे स्पष्ट झालेले नाही. विधानसभाध्यक्ष रमेश कुमार उद्या, मंगळवारी या आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ते कदाचित उद्या बंगळुरूला जातील, असा अंदाज आहे.दोन्ही पक्षांच्या १३ बंडखोर आमदारांना मंत्री करता यावे, यासाठीच सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही बंडखोर राजीनाम्याचा फेरविचार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्यांनी असे करू नये, यासाठीच भाजप नेत्यांनी त्यांना गोव्यात नेण्याचा निर्णय घेतला, असे समजते.

कर्नाटक मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा निर्णय उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सिद्धरामय्या, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामीयांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळातच सरकारमधील जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. काँग्रेसच्या मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे दिले, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

काँग्रेसचे एक मंत्री रहीम मेहमूद खान यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ असे ते म्हणाले होते. पण नंतर सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने परिस्थिती बदलली आहे.आमचा संबंध नाही - भाजपकर्नाटकमध्ये भाजपमुळेच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत केला.

मात्र संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोप फेटाळला. ते म्हणाले की, आमचा तेथील घटनांशी काहीचसंबंध नाही. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामादिल्यानंतर कर्नाटकमध्ये तशाच साऱ्या घटना घडत आहेत अशी उपरोधिक टीकाही राजनाथसिंह यांनी केली. (वृत्तसंस्था)‘लवकरच फेरबदल’कर्नाटकामध्ये लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील, असे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले. राज्यातील घडामोडींची भीती वाटत नसल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेतून पतरल्यानंतर त्यांनी सांगितले की, जे काही चालले आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. भाजप जे काही करत आहे, त्याच्याशी मला कर्तव्य नाही. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडण्यावर माझे लक्ष आहे. आमदारांच्या राजीनाम्याबाबत विचारता, त्यांनी बघू या काय होते ते, असे उत्तर त्यांनी दिले.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामी