शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

'हरियाणात लढणाऱ्या लहान पक्षांवर भाजपाचे रिमोट कंट्रोल'; राहुल गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:32 IST

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेत भाजपावर निशाणा साधला.

हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, आज खासदार राहुल गांधी यांनी एका सभेत भाजपावर निशाणा साधला. 'भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. हरियाणात अदानी आणि अंबानी सरकारची गरज नाही, येथे गरीब आणि मजुरांचे सरकार हवे आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.

याआधी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आणि गेल्या १० वर्षांत हरियाणाला काय मिळाले, असा सवाल केला. तुम्हाला बेरोजगारी मिळाली, तुम्हाला अग्निवीर मिळाला. हरियाणाने देशाची इज्जत जपली. मात्र येथील तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत. 

विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट

राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. जनतेच्या खिशातून पैसा निघत आहे. तर धनदांडग्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. त्सुनामीप्रमाणे अदानीच्या खात्यात पैसे येत आहेत पण तुमचे खाते रिकामे होत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “येथे प्रत्येक भाषणात आदर हा शब्द वापरला गेला. प्रत्येकासाठी आदर महत्त्वाचा आहे. लोकांच्या खिशात किती पैसे येत आहेत आणि किती पैसे काढले जात आहेत हेही महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी तुमचा आदर करतात, पण दिवसभर तुमच्या खिशातून पैसे काढत असतात, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले की, “येथे कोणत्या जातीचे लोक राहतात हे शोधायचे आहे. दिल्लीतील ९० अधिकारी जे संपूर्ण देश चालवतात, त्यापैकी फक्त ३ ओबीसी श्रेणीतील आहेत, जे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आहेत. दलित १५ टक्के आहेत. १०० रुपयांमध्ये १ रुपयाचा निर्णय दलित अधिकारी घेतात. म्हणूनच मी म्हटले आहे की, देशात किती ओबीसी आहेत हे जाणून घ्यायचे आहे. त्यात दलित किती आणि आदिवासी किती?, असंही राहुल गांधी म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल गांधींनी हरियाणात निवडणूक लढणाऱ्या छोट्या पक्षांवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, येथे निवडणूक लढवणारे छोटे आणि स्वतंत्र पक्ष आहेत. हे सर्व भारतीय जनता पक्षाचे पक्ष आहेत. त्यांचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे. येथे खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. इथे विचारधारांची लढाई आहे. एका बाजूला न्याय आणि अन्याय दुसऱ्या बाजूला. एकीकडे शेतकरी-मजुरांचे हित आहे तर दुसरीकडे अदानी, अंबानींसारख्या लोकांचा फायदा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा