शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

'हरियाणात लढणाऱ्या लहान पक्षांवर भाजपाचे रिमोट कंट्रोल'; राहुल गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:32 IST

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेत भाजपावर निशाणा साधला.

हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, आज खासदार राहुल गांधी यांनी एका सभेत भाजपावर निशाणा साधला. 'भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. हरियाणात अदानी आणि अंबानी सरकारची गरज नाही, येथे गरीब आणि मजुरांचे सरकार हवे आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.

याआधी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आणि गेल्या १० वर्षांत हरियाणाला काय मिळाले, असा सवाल केला. तुम्हाला बेरोजगारी मिळाली, तुम्हाला अग्निवीर मिळाला. हरियाणाने देशाची इज्जत जपली. मात्र येथील तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत. 

विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट

राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. जनतेच्या खिशातून पैसा निघत आहे. तर धनदांडग्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. त्सुनामीप्रमाणे अदानीच्या खात्यात पैसे येत आहेत पण तुमचे खाते रिकामे होत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “येथे प्रत्येक भाषणात आदर हा शब्द वापरला गेला. प्रत्येकासाठी आदर महत्त्वाचा आहे. लोकांच्या खिशात किती पैसे येत आहेत आणि किती पैसे काढले जात आहेत हेही महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी तुमचा आदर करतात, पण दिवसभर तुमच्या खिशातून पैसे काढत असतात, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले की, “येथे कोणत्या जातीचे लोक राहतात हे शोधायचे आहे. दिल्लीतील ९० अधिकारी जे संपूर्ण देश चालवतात, त्यापैकी फक्त ३ ओबीसी श्रेणीतील आहेत, जे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आहेत. दलित १५ टक्के आहेत. १०० रुपयांमध्ये १ रुपयाचा निर्णय दलित अधिकारी घेतात. म्हणूनच मी म्हटले आहे की, देशात किती ओबीसी आहेत हे जाणून घ्यायचे आहे. त्यात दलित किती आणि आदिवासी किती?, असंही राहुल गांधी म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल गांधींनी हरियाणात निवडणूक लढणाऱ्या छोट्या पक्षांवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, येथे निवडणूक लढवणारे छोटे आणि स्वतंत्र पक्ष आहेत. हे सर्व भारतीय जनता पक्षाचे पक्ष आहेत. त्यांचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे. येथे खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. इथे विचारधारांची लढाई आहे. एका बाजूला न्याय आणि अन्याय दुसऱ्या बाजूला. एकीकडे शेतकरी-मजुरांचे हित आहे तर दुसरीकडे अदानी, अंबानींसारख्या लोकांचा फायदा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा