शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

'हरियाणात लढणाऱ्या लहान पक्षांवर भाजपाचे रिमोट कंट्रोल'; राहुल गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:32 IST

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेत भाजपावर निशाणा साधला.

हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, आज खासदार राहुल गांधी यांनी एका सभेत भाजपावर निशाणा साधला. 'भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. हरियाणात अदानी आणि अंबानी सरकारची गरज नाही, येथे गरीब आणि मजुरांचे सरकार हवे आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.

याआधी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आणि गेल्या १० वर्षांत हरियाणाला काय मिळाले, असा सवाल केला. तुम्हाला बेरोजगारी मिळाली, तुम्हाला अग्निवीर मिळाला. हरियाणाने देशाची इज्जत जपली. मात्र येथील तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत. 

विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट

राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या राजवटीत गरिबांच्या खिशातून पैसे काढले जात आहेत. जनतेच्या खिशातून पैसा निघत आहे. तर धनदांडग्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. त्सुनामीप्रमाणे अदानीच्या खात्यात पैसे येत आहेत पण तुमचे खाते रिकामे होत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “येथे प्रत्येक भाषणात आदर हा शब्द वापरला गेला. प्रत्येकासाठी आदर महत्त्वाचा आहे. लोकांच्या खिशात किती पैसे येत आहेत आणि किती पैसे काढले जात आहेत हेही महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी तुमचा आदर करतात, पण दिवसभर तुमच्या खिशातून पैसे काढत असतात, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले की, “येथे कोणत्या जातीचे लोक राहतात हे शोधायचे आहे. दिल्लीतील ९० अधिकारी जे संपूर्ण देश चालवतात, त्यापैकी फक्त ३ ओबीसी श्रेणीतील आहेत, जे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आहेत. दलित १५ टक्के आहेत. १०० रुपयांमध्ये १ रुपयाचा निर्णय दलित अधिकारी घेतात. म्हणूनच मी म्हटले आहे की, देशात किती ओबीसी आहेत हे जाणून घ्यायचे आहे. त्यात दलित किती आणि आदिवासी किती?, असंही राहुल गांधी म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल गांधींनी हरियाणात निवडणूक लढणाऱ्या छोट्या पक्षांवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, येथे निवडणूक लढवणारे छोटे आणि स्वतंत्र पक्ष आहेत. हे सर्व भारतीय जनता पक्षाचे पक्ष आहेत. त्यांचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे. येथे खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. इथे विचारधारांची लढाई आहे. एका बाजूला न्याय आणि अन्याय दुसऱ्या बाजूला. एकीकडे शेतकरी-मजुरांचे हित आहे तर दुसरीकडे अदानी, अंबानींसारख्या लोकांचा फायदा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा