शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:41 IST

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीपासून २७ जुलैपासून पसमांदा स्नेह संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे विरोधक सरकारविरोधात एकवटत आहेत, तर दुसरीकडे भाजप आपली ताकत वाढवण्यावर भर देत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लीम समुदायामध्ये आपली पोहोच वाढवण्यासाठी सुचवले आहे. याची दखल घेत भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीपासून २७ जुलैपासून पसमांदा स्नेह संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयापासून पसमांदा स्नेह संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. पहिल्या दिवशी ही यात्रा भाजप मुख्यालयापासून सुरू होईल आणि पक्षाचे माजी नेते सिकंदर बख्त यांच्या समाधीवर जाईल, जिथे त्यांना पुष्पहार अर्पण केला जाईल.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सय्यद यासिर अली जिलानी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, १ ऑगस्टपासून ही यात्रा दिल्लीच्या तुर्कमान गेटपासून सुरू होईल आणि दिलशाद गार्डन मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करेल. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर प्रदेशामध्ये असणार आहे. जौनपूर, आझमगड आणि देवरियामार्गे ही यात्रा बिहारमध्ये दाखल होईल. ही यात्रा दुसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये आयोजित केली जाईल आणि नंतर किशनगंज मार्गे पश्चिम बंगालला जाईल. 

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यानंतर यात्रेचा चौथा टप्पा झारखंडमध्ये असणार आहे. त्यानंतर येथून यात्रा ओडिशात दाखल होईल. ही यात्रा ओडिशामार्गे छत्तीसगडला जाणार आहे. पाचव्या टप्प्यात ही यात्रा महाराष्ट्रात काढण्यात येणार असून त्यानंतर ती तेलंगणात जाऊन पुन्हा महाराष्ट्रात येईल. सहाव्या टप्प्यात ही यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात आणि नंतर मध्य प्रदेशातून राजस्थानला जाणार आहे. सातव्या टप्प्यात ही यात्रा हरयाणामध्ये जाणार आहे. यानंतर १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी पसमांदा स्नेह संवाद यात्रेची सांगता होईल.  

याचबरोबर, या यात्रेदरम्यान पसमांदा मुस्लीम समाजाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. यात्रेदरम्यान या समाजातील प्रबुद्ध व्यक्ती, महिला व मुलींशी संवाद साधला जाणार आहे. तसेच, या यात्रेत अनेक छोट्या-मोठ्या सभांचे आयोजन सुद्धा केले जाणार आहे, असेही भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सय्यद यासिर अली जिलानी यांनी सांगितले.

'पसमांदा मुस्लीम' म्हणजे कोण?पसमांदा हा फारसी शब्द असून, जे मागे राहिलेत असा त्याचा अर्थ होतो. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर असे मुस्लिम लोक जे समुदायातील इतर वर्गांच्या तुलनेत पिछाडलेले आहेत. हा पसमांदा समाज मागे राहण्यामागे जातिव्यवस्था हे एक कारण सांगितले जाते. अगदी सुरुवातीच्या काळात पसमांदा शब्दाचा वापर एका वर्गासाठी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वर्षानुवर्षे हा शब्द मुस्लिमांमधील इतर मागास जाती, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वापरात आला.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक