शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Ravi Shankar Prasad : "काँग्रेस आज एकाच कुटुंबाच्या खिशात, हे कुटुंब पक्षाची मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:28 IST

BJP Ravi Shankar Prasad Slams Congress Rahul Gandhi : भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी "देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढत चालली आहे. परंतु संसदेत यावर चर्चा होऊ दिली जात नाही. देशात ७० वर्षात निर्माण झालेली लोकशाही गेल्या ८ वर्षात संपवली आहे. लोकांसमोर जे सत्य आहे ते उघड व्हायला हवं. मी जेवढे सत्य लोकांसमोर आणेन तेवढं माझ्यावर हल्ला केला जाईल. लोकांचा मुद्दा उचलण्याचं काम मी करत राहणार आहे. जो धमकावतो तोच घाबरलेला असतो" अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पण आता भाजपानेही राहुल गांधींच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

भाजपा नेते रविशंकर प्रसाद (BJP Ravi Shankar Prasad) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे. तसेच लोकशाहीचा सल्ला देणाऱ्या राहुल गांधींच्याच आजीने मीडियावर बंदी घातली होती. काँग्रेसमध्ये चांगले नेते आहेत. पण तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? हा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधींचा पक्ष आहे. जनतेने तुम्हाला नाकारले, याला आम्ही जबाबदार कुठून? असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना विचारला आहे. 

"काँग्रेस एकाच कुटुंबाच्या खिशात, हे कुटुंब पक्षाची मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतंय"

रविशंकर प्रसाद म्हणाले की, "काँग्रेसची लोकशाही ही भ्रष्टाचाराची व्यवस्था आहे. भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी राहुल गांधी टीका करत आहेत. राहुल गांधी जामिनावर का बाहेर आहेत? काँग्रेस पक्ष आज एकाच कुटुंबाच्या खिशात आहे. हे कुटुंब आता पक्षाची मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी सभागृहात चर्चा झाली तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी त्यात सहभाग घेतला नाही. महागाई आणि बेरोजगारीची चर्चा हे निमित्त आहे. योग्य कारण म्हणजे ईडीला घाबरवणे, धमकी देणे आणि कुटुंबाला वाचवणे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी जितकं जनतेचे मुद्दे उचलणार, महागाई, बेरोजगारी यावर बोलणार तितके माझ्यावर आक्रमण केले जाणार आहे. माझ्यावर जितके आक्रमण होईल तितकाच जास्त मला फायदा होणार आहे. मी आक्रमणांना घाबरणार नाही. देशात लोकशाहीची हत्या झाली आहे. जी लोकशाही ७० वर्षात आम्ही बनवली ती ८ वर्षात संपवली आहे. देशात आजच्या घडीला लोकशाही नाही. केवळ ४ लोकांची हुकुमशाही आहे. जनतेच्या मुद्द्यावर बोलायला लागल्यावर आम्हाला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते असा आरोप राहुल गांधींनी केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद