शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

पोटनिवडणूक निकालांनी भाजपा, राजेंना दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:30 IST

सत्ताधारी पक्षाने पोटनिवडणूक हरणे तसे धक्कादायकच. विशेषत: राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे ना सरकारमध्ये काही फरक पडतो ना विरोधी लोकप्रतिनिधीकडून कामे करून घेणे शक्य होते.

नवी दिल्ली  - सत्ताधारी पक्षाने पोटनिवडणूक हरणे तसे धक्कादायकच. विशेषत: राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे ना सरकारमध्ये काही फरक पडतो ना विरोधी लोकप्रतिनिधीकडून कामे करून घेणे शक्य होते. तरीही अजमेर व अलवरच्या मतदारांनी लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला निचडून देणे भाजपाला अडचणीचे ठरणार आहे.या राज्यांत काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपासाठी ही धोक्याची घंटाच मानले जात आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कारभाराविषयी लोकांत नाराजी आहे की, भाजपावर राग आहे, हे या निवडणुकांतून स्पष्ट झाले नसले तरी, विधानसभा निवडणुका भाजपाला सोप्या जाणार नाहीत, असे मात्र उघड आहे. या पोटनिवडणुकांच्या निकालांचे परिणाम काँग्रेस व भाजपच्या मनोधैर्यावर व सत्ता समीकरणांवर परिणाम करणारे आहेत. स्वत: वसुंधरा राजे यांनी या पोटनिवडणुकांत प्रचार केला होता. काही आठवडे त्यांनी मतदारसंघात घालवले होते. तब्बल २४ मंत्री भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी तिथे मुक्काम ठोकून होते. त्यामुळे ते या पराभवाची जबाबदारी टाळू शकत नाहीत. ज्या फरकाने पराभव झाला त्यावरून सरकारविरोधात जवळपास लाट असल्याचे दिसते. वसुंधरा राजे या लोकप्रिय नसून नेतृत्वात बदल व्हावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील अनेकांना वाटते. भाजपमध्ये ज्या गटाला राजे यांचे नेतृत्व नको आहे, त्यांना या पराभवाने बळ मिळेल. राजे यांना राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचारसुरू झाल्यावर या पराभवामुळे बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. त्याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांचे नीतिधैर्यही कमी होईल. (वृत्तसंस्था)काँग्रेसमध्ये पुन्हा सत्तास्पर्धा?हे पराभव मोदी सरकार व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला चांगलाच झोंबणारे आहेत. या तिन्ही विजय म्हणजे काँग्रेसला व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना मोठा उत्साह देणारे आहेत. मात्र या विजयानंतर पायलट व माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात पक्षांतर्गत सत्तास्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकRajasthanराजस्थान