शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:07 IST

भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले असं नड्डा यांनी म्हटलं.

भोपाळ - केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा अपमान केला आहे हे देशद्रोहापेक्षा कमी नाही अशा शब्दात नड्डा यांनी निशाणा साधला. मध्य प्रदेशात भारत-पाकिस्तान सीजफायरवर राहुल गांधी यांनी जे विधान केले त्यावरून नड्डा यांनी पलटवार केला. राहुल गांधी यांच्या विधानावरून सत्ताधारी भाजपा नेते संतापले आहेत. 

जे.पी.नड्डा म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाला सरेंडर शब्द वापरणे हे दुर्दैवी आहे. भारतीय सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा हा घोर अपमान आहे. जर एखादा पाकिस्तानी असं बोलला असता तर आम्ही त्याच्यावर हसलो असतो परंतु ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानात खळबळ माजली, त्यानंतर पाकिस्तानी जनतेपासून त्यांचे सैन्य, सरकार आणि त्यांच्या पंतप्रधानांनीही हे बोलण्याची हिंमत केली नाही. परंतु राहुल गांधी जे बोलतायेत ते देशद्रोहापेक्षा कमी नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले. पाकिस्तान जगाला रडत रडत भारतीय सैन्याने पाकमध्ये १८ ठिकाणी हल्ला केला, त्यात सर्व उद्ध्वस्त झाल्याचे सांगतोय आणि राहुल गांधी देशात सरेंडर केल्याची गोष्ट करतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशाची घोषणा कुठल्याही भाजपा प्रवक्त्याने केली नाही हे राहुल गांधींना कळायला हवे होते. भारतीय सैन्याने हा पराक्रम जगासमोर सांगितला असंही जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

दरम्यान, ज्यांचे धोरण कायम सरेंडरचे राहिले आहे त्यांना दुसरे काही सुचणार नाही. राहुल गांधीजी सरेंडर तुम्ही करता, तुमच्या पक्षाने केले आहे. तुमच्या नेत्यांनी केले आहे कारण तुमचा इतिहास तोच आहे. भारत कधीही सरेंडर करत नाही. सरेंडर हा तुमच्या पक्षाच्या डिक्शनरीत आहे. तुमचा डीएनए आहे. काँग्रेस पक्षाच्या सरकारचा इतिहास आठवा त्यात तुम्ही सरेंडर केल्याचे दिसून येईल. तुम्ही दहशतवादासमोरही सरेंडर केले. १९७१ ची लढाई जिंकल्यानंतरही शिमला इथं टेबलवर सरेंडर केले. १९६२ च्या लढाईत सरेंडर केले. देशाच्या स्वातंत्र्यावेळी तुम्ही मुस्लीम लीगसमोरही सरेंडर केले असा घणाघात जे.पी. नड्डा यांनी केला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

भारत-पाकिस्तान यांच्या सीजफायरवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा-आरएसएसची सरेंडरची सवय आहे. जर देशात काँग्रेस सरकार असते तर कधीही सरेंडर केले नसते. ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान मोदींनी तातडीने सरेंडर केले. भाजपा-आरएसएसचा स्वभावच कायम झुकण्याचा आहे. ट्रम्प यांनी मोदींना इशारा केला तर मोदींनी ट्रम्प यांच्या आदेशाचे पालन केले असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी