शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:07 IST

भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले असं नड्डा यांनी म्हटलं.

भोपाळ - केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा अपमान केला आहे हे देशद्रोहापेक्षा कमी नाही अशा शब्दात नड्डा यांनी निशाणा साधला. मध्य प्रदेशात भारत-पाकिस्तान सीजफायरवर राहुल गांधी यांनी जे विधान केले त्यावरून नड्डा यांनी पलटवार केला. राहुल गांधी यांच्या विधानावरून सत्ताधारी भाजपा नेते संतापले आहेत. 

जे.पी.नड्डा म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाला सरेंडर शब्द वापरणे हे दुर्दैवी आहे. भारतीय सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा हा घोर अपमान आहे. जर एखादा पाकिस्तानी असं बोलला असता तर आम्ही त्याच्यावर हसलो असतो परंतु ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानात खळबळ माजली, त्यानंतर पाकिस्तानी जनतेपासून त्यांचे सैन्य, सरकार आणि त्यांच्या पंतप्रधानांनीही हे बोलण्याची हिंमत केली नाही. परंतु राहुल गांधी जे बोलतायेत ते देशद्रोहापेक्षा कमी नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले. पाकिस्तान जगाला रडत रडत भारतीय सैन्याने पाकमध्ये १८ ठिकाणी हल्ला केला, त्यात सर्व उद्ध्वस्त झाल्याचे सांगतोय आणि राहुल गांधी देशात सरेंडर केल्याची गोष्ट करतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशाची घोषणा कुठल्याही भाजपा प्रवक्त्याने केली नाही हे राहुल गांधींना कळायला हवे होते. भारतीय सैन्याने हा पराक्रम जगासमोर सांगितला असंही जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

दरम्यान, ज्यांचे धोरण कायम सरेंडरचे राहिले आहे त्यांना दुसरे काही सुचणार नाही. राहुल गांधीजी सरेंडर तुम्ही करता, तुमच्या पक्षाने केले आहे. तुमच्या नेत्यांनी केले आहे कारण तुमचा इतिहास तोच आहे. भारत कधीही सरेंडर करत नाही. सरेंडर हा तुमच्या पक्षाच्या डिक्शनरीत आहे. तुमचा डीएनए आहे. काँग्रेस पक्षाच्या सरकारचा इतिहास आठवा त्यात तुम्ही सरेंडर केल्याचे दिसून येईल. तुम्ही दहशतवादासमोरही सरेंडर केले. १९७१ ची लढाई जिंकल्यानंतरही शिमला इथं टेबलवर सरेंडर केले. १९६२ च्या लढाईत सरेंडर केले. देशाच्या स्वातंत्र्यावेळी तुम्ही मुस्लीम लीगसमोरही सरेंडर केले असा घणाघात जे.पी. नड्डा यांनी केला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

भारत-पाकिस्तान यांच्या सीजफायरवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा-आरएसएसची सरेंडरची सवय आहे. जर देशात काँग्रेस सरकार असते तर कधीही सरेंडर केले नसते. ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान मोदींनी तातडीने सरेंडर केले. भाजपा-आरएसएसचा स्वभावच कायम झुकण्याचा आहे. ट्रम्प यांनी मोदींना इशारा केला तर मोदींनी ट्रम्प यांच्या आदेशाचे पालन केले असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी