शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच राज्यांतील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी, भाजपची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 10:46 IST

सहा चिंतन शिबिरांतून होणार केंद्र सरकारच्या निर्णयांची चर्चा

ठळक मुद्देपक्षाकडून प्रत्येक राज्यातील माहिती घेतली जात आहे. संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी उत्तर प्रदेश, अरुण सिंह यांनी उत्तराखंड, दुष्यंत गौतम यांनी पंजाब, सीटी रवि यांनी गोवा आणि दिलीप सेकिया यांनी मणिपूरबाबतीत माहिती दिली

नितीन अग्रवाल / शीलेश शर्मा नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने या राज्यात संघटना मजबूत करणे आणि प्रलंबित योजना निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला आहे.  भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील प्रलंबित विकास योजनांबाबत सातत्याने केंद्रीय मंत्र्यांकडून माहिती घेत आहेत. पक्षाच्या मुख्यालयात शनिवारी नड्डा यांनी केंद्रीयमंत्री राजनाथसिंह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान आणि किरन रिजिजू यांच्याशी चर्चा केली. 

पक्षाकडून प्रत्येक राज्यातील माहिती घेतली जात आहे. संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी उत्तर प्रदेश, अरुण सिंह यांनी उत्तराखंड, दुष्यंत गौतम यांनी पंजाब, सीटी रवि यांनी गोवा आणि दिलीप सेकिया यांनी मणिपूरबाबतीत माहिती दिली. बूथ आणि मंडळ स्तरावर समितीचे पुनर्गठन करण्याचे निर्देश सर्व राज्यांचे प्रभारी यांना देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशात कोण कुणासोबत?nउत्तर प्रदेशात कोण कुणासोबत उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेसला बाजूला करण्यासाठी नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूला बिहारमधून उत्तर प्रदेशात आणण्यासाठी भाजप डावपेच आखत आहे. जेणेकरुन, उत्तर प्रदेशातील कुर्मी वोट बँकेला सपा आणि काँग्रेसकडे जाण्यापासून रोखता येईल. जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, जेडीयू भाजपासोबत आघाडी करु शकतो. पण, जेडीयूला किती जागा मिळतील यावर हे अवलंबून आहे.

nअशीही चर्चा आहे की, बसपा प्रमुख मायावती थेट भाजपाशी आघाडी करणार नाहीत. पण, त्यांचा प्रयत्न भाजपासोबत रणनीतीच्या दृष्टीने सुसंगत पाऊल टाकण्याचा आहे. राज्यात बसपाची स्थिती काँग्रेसपेक्षा खराब आहे. तर, कोणताही पक्ष काँग्रेससोबत आघाडी करायला तयार नाही. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. nकाँग्रेसच्या आशा सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावरच आहेत. प्रियांका गांधी जुलैपासूनच लखनौमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. सपाने राष्ट्रीय लोकदलासोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यांक मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा प्रयत्नात आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा