शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

MP, छत्तीसगडमधील मतदानापूर्वी भाजपनं खेळलं मोठं कार्ड, केली 'PM जनमन'ची घोषणा, कुणाला होणार लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:06 IST

आदिवासी समाजाचे प्रतीक असलेले भगवान बिरसा मुंडा, यांना त्यांच्या जन्मस्थानी जाणून आदरांजली अर्पण केल्यानंतर, त्यांनी या नव्या योजनेची घोषणा केली आणि फायदे सांगितले.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा आखाडा  चांगलाच रंगला आहे. यातच आता, येथील निवडणुकीपूर्वीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे आदिवासी कार्ड खेळले आहे. आदिवासी समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झारखंडमध्ये 'पीएम जनमन' मोहिमेची घोषणा केली. आदिवासी समाजाचे प्रतीक असलेले भगवान बिरसा मुंडा, यांना त्यांच्या जन्मस्थानी जाणून आदरांजली अर्पण केल्यानंतर, त्यांनी या नव्या योजनेची घोषणा केली आणि फायदे सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत सरकार, ज्यांच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले, अशा सर्वात मागास आदिवासींपर्यंत पोहोचणार आहे. पीएम जनमन हा विकसित भारताच्या संकल्पाचा एक मुख्य आधार आहे. अर्थात, पीएम आदिवासी महाअभियान आहे. मोदी हिम्मतीने आदिवासी न्याय अभियान घेऊन निघाला आहे. स्वातंत्र्यानंतर, अनेक दशके आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले. अटलजी सरकारने आदिवासी समाजासाठी स्वतंत्रमंत्रालयाची स्थापना केली आणि बजेट दिले. आता आमच्या सरकारच्या काळात आदिवासी कल्याणचे बजेट पूर्वीच्या तुलनेत सहा पट वाढळे आहे.

22 हजार गावांतील आदिवासींसाठी खर्च होणार 24 हजार कोटी -पंतप्रधान मोदी म्हणाले, पीएम जनमन अंतर्गत सरकार अशा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचेल, ज्यांच्यापर्यंत अद्यापही पोहोचले गेलेले नाही. हे असे आदिवासी समूह आहेत, ज्यांतील बहुतेकांना अजूनही जंगलात रहावे लागत आहे. या लोकांनी अद्याप ट्रेनही बघितलेली नाही. सरकारने देशातील 22 हजाराहून अधिक गावांमध्ये राहणाऱ्या, अशा 75 आदिवासी समुदायांची ओळख पटवली आहे. 

मोदी म्हणाले, ज्याप्रमाणे मागास लोकांमध्ये अती मागास आहेत. तसेच, आदिवासी समाजातही अती मागे असलेले आदिवासीही आहेत. देशभरात त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या अतिमागास आदिवासींना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. पक्के घर मिळालेले नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये मुलांनी शाळा पाहिली नाही. याच वेळी, भारत सरकार या महाअभियानावर 24 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, 17 नोव्हेंबरला मध्येप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. संबंधित दोन्ही राज्यांत मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे. निवडणुकीत या समाजाची भूमिकाही महत्वाची ठरते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपा