शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

३ राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:00 IST

दोन उपमुख्यमंत्री करण्याचा विचार, राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याशिवाय दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे.

संजय शर्मा नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाने या तीन राज्यांतील भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोषही या बैठकीत उपस्थित होते. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवणार आहे. सोशल इंजिनिअरिंग आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचाही विचार सुरू आहे. 

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि कैलाश विजयवर्गीय हेही मोठे दावेदार मानले जात आहेत. शिवराजसिंह चौहान यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदी ठेवण्याचीही चर्चा आहे. त्यांना केंद्रातील राजकारणात आणल्यास त्यांची जागा या तिन्ही नेत्यांपैकी कोणीही घेऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नावावर अंतिम शिक्कामोर्तब करायचे आहे. मागासवर्गीय असल्याने केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा दावाही भक्कम मानला जात आहे. 

राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याशिवाय दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे. जातीय समीकरणाच्या दृष्टीने राजस्थानमध्ये दोन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात. त्यापैकी एक अनुसूचित जाती किंवा मागासवर्गीय असू शकतो. छत्तीसगडमध्येही माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशिवाय प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांची जोरदार दावेदारी दिसून येत आहे. येथेही भाजपने ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री केले, तर ते आदिवासी नेत्याला उपमुख्यमंत्री बनवू शकतात. 

दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक पाठवणार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपचे केंद्रीय नेतृत्व एक केंद्रीय निरीक्षक पाठवणार आहे. ते विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून निवडून आलेल्या आमदारांचे मत जाणून घेतील. पुढील दोन दिवसांत भाजप तिन्ही राज्यांमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावेल आणि नवा नेता निवडेल. हे नेते राज्यपालांना भेटतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक