शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

३ राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:00 IST

दोन उपमुख्यमंत्री करण्याचा विचार, राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याशिवाय दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे.

संजय शर्मा नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाने या तीन राज्यांतील भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोषही या बैठकीत उपस्थित होते. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवणार आहे. सोशल इंजिनिअरिंग आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचाही विचार सुरू आहे. 

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि कैलाश विजयवर्गीय हेही मोठे दावेदार मानले जात आहेत. शिवराजसिंह चौहान यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदी ठेवण्याचीही चर्चा आहे. त्यांना केंद्रातील राजकारणात आणल्यास त्यांची जागा या तिन्ही नेत्यांपैकी कोणीही घेऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नावावर अंतिम शिक्कामोर्तब करायचे आहे. मागासवर्गीय असल्याने केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा दावाही भक्कम मानला जात आहे. 

राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याशिवाय दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे. जातीय समीकरणाच्या दृष्टीने राजस्थानमध्ये दोन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात. त्यापैकी एक अनुसूचित जाती किंवा मागासवर्गीय असू शकतो. छत्तीसगडमध्येही माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशिवाय प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांची जोरदार दावेदारी दिसून येत आहे. येथेही भाजपने ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री केले, तर ते आदिवासी नेत्याला उपमुख्यमंत्री बनवू शकतात. 

दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक पाठवणार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपचे केंद्रीय नेतृत्व एक केंद्रीय निरीक्षक पाठवणार आहे. ते विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून निवडून आलेल्या आमदारांचे मत जाणून घेतील. पुढील दोन दिवसांत भाजप तिन्ही राज्यांमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावेल आणि नवा नेता निवडेल. हे नेते राज्यपालांना भेटतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक