शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

BJP Parliamentary Board: 'त्या'वेळी वाजपेयी-आडवाणींना हटवले अन् आता गडकरी चौहान; भाजपात मोठे फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 19:10 IST

२०१४ मध्ये संसदीय समितीत बदल केले होते. त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आणि पक्षाचे महासचिव जेपी नड्डा यांचा समावेश होता.

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीने बुधवारी नवीन संसदीय समितीची घोषणा केली. त्याचसोबत केंद्रीय निवडणूक समितीही जाहीर केली. पक्षात दोन्ही समितींच्या विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट २०१४ नंतर पहिल्यांदाच या समितीमध्ये बदल करण्यात आले आहेत. खूप दिवसांपासून याची चर्चा सुरू होती. कारण समितीत अनेक जागा रिक्त झाल्या होत्या. 

नवीन समितींच्या कार्यकारणीतून नितीन गडकरी, शिवराज चौहान यांना वगळण्यात आले आहे. सर्वात जास्त चर्चा याचीच होत आहे. तर ७६ वर्षीय सत्यनारायण जटिया आणि ७९ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना समितीत स्थान देण्यात आले आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना संसदीय बोर्डातून वगळलं होते. या तिन्ही नेत्यांचे वय ७५ वर्षापेक्षा अधिक असल्याचं त्यावेळी म्हटलं जात होते. 

भाजपा संसदीय समिती आणि निवडणूक समितीत किती सदस्य असतात?भाजपा संसदीय बोर्डात ११ सदस्य असतात तर केंद्रीय निवडणूक समितीत १९ सदस्य असतात. त्यात ११ संसदीय समितीचे सर्व सदस्यांचा समावेश असतो. त्याचसोबत पक्षाचे महासचिव यांनाही आरएसएसचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही समितीत स्थान दिले जाते. बुधवारी घोषित झालेल्या नावांमध्ये १५ नावांचा समावेश करण्यात आला आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर अमित शाह यांना भाजपाचं अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये नवीन संसदीय समिती आणि केंद्रीय निवडणूक समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळी संसदीय बोर्डातून तीन ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले. त्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा समावेश होता. तेव्हा पक्षाने पहिल्यांदाच मार्गदर्शक मंडळ स्थापन केले. त्यात वाजपेयी, आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांचा समावेश केला. मात्र यावेळी या समितीबाबत कुठलीही घोषणा झाली नाही. 

संसदीय बोर्डात नवीन चेहऱ्यांना संधी

२०१४ नंतर संसदीय समितीत बदल केले होते. त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आणि पक्षाचे महासचिव जेपी नड्डा यांचा समावेश होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने अमित शाह पहिल्यांदाच या समितीचे सदस्य बनले. या समितीत शिवराज चौहान, जेपी नड्डा, अमित शाह यांच्यासोबत नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकैय्या नायडू, अनंत कुमार, थावरचंद गहलोत यांचा समावेश होता. त्यावेळी संघटन महासचिव रामलाल हेदेखील समितीत होते. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अनंत कुमार यांच्या निधनानंतर अनेक दिवस त्यांच्या जागा रिक्त होत्या. तर व्यैकंया नायडू उपराष्ट्रपती आणि थावरचंद गहलोत राज्यपाल बनल्यानंतर त्यांचीही जागा रिक्त होती. २०१९ मध्ये बीएल संतोष पक्षाचे महासचिव बनल्यानंतर ते संसदीय बोर्डात समाविष्ट झाले. मागील संसदीय समितीत केवळ ७ सदस्य राहिले होते. 

यंदा संसदीय समितीत पंजाबचे इकबाल लालपुरा, हरियाणाचे सुधा यादव, तेलंगणाचे के. लक्ष्मण, मध्य प्रदेशचे सत्यनारायण जटिला यांचा समावेश केला आहे. जटिया आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा पंच्याहत्तरी ओलांडलेले नेते आहेत. तरीही त्यांचा समावेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानNarendra Modiनरेंद्र मोदी