शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

देशात असमानता वाढतेय, खासदारांचा पगार प्रायव्हेट सेक्टरपेक्षाही जास्त; वरुण गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 10:35 IST

देशात असमानता वाढते आहे, प्रायव्हेट सेक्टरपेक्षाही खासदारांचा पगार जास्त असल्याचं भाजपाचे खासदार वरूण गांधी यांनी म्हटलं आहे

नवी दिल्ली- देशात असमानता वाढते आहे, प्रायव्हेट सेक्टरपेक्षाही खासदारांचा पगार जास्त असल्याचं भाजपाचे खासदार वरूण गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच खासदारांच्या वेतनात वाढ करू नये, अशी मागणी भाजपाचे खासदार वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भारतात असमानता सातत्याने वाढत असल्याची चिंता व्यक्त करत भारतातील एक टक्के श्रीमंत लोकांकडे देशाची ६० टक्के संपत्ती आहे. १९३० मध्ये हेच प्रमाण २१ टक्के इतके होते. भारतात ८४ अब्जाधीशांकडे देशातील ७० टक्के संपत्ती आहे. हा फरक आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचं वरूण गांधी यांनी म्हंटलं. 

आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या सामाजिक, आर्थिक समस्यांसाठी सक्रिय होणे गरजेचे आहे. सर्वच खासदार आर्थिकदृष्टया संपन्न आहेत, असे नाही. अनेकजण वेतनावर अवलंबून आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना विनंती आहे की, त्यांनी आर्थिकदृष्टया संपन्न खासदारांना आपल्या उर्वरित कालावधीतील वेतन सोडण्याचं आवाहन करावं. यामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल, असंही ते म्हणाले. 

सोळाव्या लोकसभेत सुमारे ४४० खासदार कोट्यधीश आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ करू नये, अशा आशयाचं पत्र त्यांनी महाजन यांना दिलं आहे. आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या खासदारांनी आपले उर्वरित काळातील वेतन सोडावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.लोकसभेतील प्रत्येक खासदाराकडे सरासरी १४.६१ कोटी रूपयांची तर राज्यसभेतील प्रत्येक खासदाराकडे २०.१२ कोटींची संपत्ती आहे. अशावेळी सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने कोट्यवधींची संपत्ती असलेल्या खासदारांना वेतन घेऊ नये, असं आवाहन करावं. वरूण यांनी आपल्या पत्रात एक उदाहरणही दिले आहे. १९४९ मध्ये पंडित नेहरूंच्या कॅबिनेटने देशाची आर्थिक स्थिती पाहून तीन महिने वेतन न घेण्याचा निर्णय घेतला होता. वेळोवेळी खासदार आणि आमदारांचे वेतन केव्हा आणि कितीने वाढायला हवे, यासाठी एक संवैधानिक समिती बनवण्याची गरज असल्याचे वरूण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाSumitra Mahajanसुमित्रा महाजनMember of parliamentखासदार