शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात असमानता वाढतेय, खासदारांचा पगार प्रायव्हेट सेक्टरपेक्षाही जास्त; वरुण गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 10:35 IST

देशात असमानता वाढते आहे, प्रायव्हेट सेक्टरपेक्षाही खासदारांचा पगार जास्त असल्याचं भाजपाचे खासदार वरूण गांधी यांनी म्हटलं आहे

नवी दिल्ली- देशात असमानता वाढते आहे, प्रायव्हेट सेक्टरपेक्षाही खासदारांचा पगार जास्त असल्याचं भाजपाचे खासदार वरूण गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच खासदारांच्या वेतनात वाढ करू नये, अशी मागणी भाजपाचे खासदार वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भारतात असमानता सातत्याने वाढत असल्याची चिंता व्यक्त करत भारतातील एक टक्के श्रीमंत लोकांकडे देशाची ६० टक्के संपत्ती आहे. १९३० मध्ये हेच प्रमाण २१ टक्के इतके होते. भारतात ८४ अब्जाधीशांकडे देशातील ७० टक्के संपत्ती आहे. हा फरक आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचं वरूण गांधी यांनी म्हंटलं. 

आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या सामाजिक, आर्थिक समस्यांसाठी सक्रिय होणे गरजेचे आहे. सर्वच खासदार आर्थिकदृष्टया संपन्न आहेत, असे नाही. अनेकजण वेतनावर अवलंबून आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना विनंती आहे की, त्यांनी आर्थिकदृष्टया संपन्न खासदारांना आपल्या उर्वरित कालावधीतील वेतन सोडण्याचं आवाहन करावं. यामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल, असंही ते म्हणाले. 

सोळाव्या लोकसभेत सुमारे ४४० खासदार कोट्यधीश आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ करू नये, अशा आशयाचं पत्र त्यांनी महाजन यांना दिलं आहे. आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या खासदारांनी आपले उर्वरित काळातील वेतन सोडावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.लोकसभेतील प्रत्येक खासदाराकडे सरासरी १४.६१ कोटी रूपयांची तर राज्यसभेतील प्रत्येक खासदाराकडे २०.१२ कोटींची संपत्ती आहे. अशावेळी सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने कोट्यवधींची संपत्ती असलेल्या खासदारांना वेतन घेऊ नये, असं आवाहन करावं. वरूण यांनी आपल्या पत्रात एक उदाहरणही दिले आहे. १९४९ मध्ये पंडित नेहरूंच्या कॅबिनेटने देशाची आर्थिक स्थिती पाहून तीन महिने वेतन न घेण्याचा निर्णय घेतला होता. वेळोवेळी खासदार आणि आमदारांचे वेतन केव्हा आणि कितीने वाढायला हवे, यासाठी एक संवैधानिक समिती बनवण्याची गरज असल्याचे वरूण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाSumitra Mahajanसुमित्रा महाजनMember of parliamentखासदार