शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:26 IST

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दावा केला असून यासाठी केंद्रातील मोदी सरकारला काही विशेष बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देभाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच हिंदूंच्या अधिकाराविषयी बोलत असतात. याआधी हिंदुत्वासाठी युद्ध १६ मे २०१४ पासून सुरू झाले, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली : २०२४ आणि २०२९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता येईल, असा दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दावा केला असून यासाठी केंद्रातील मोदी सरकारला काही विशेष बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "२०२४ आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत येईल. मात्र, भाजपाला जनादेशचा वापर ब्रिटिश राजशाहीने तयार केलेला भारतीय इतिहास सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढींमध्ये राष्ट्रवाद आणि हिंदुस्थानविषयी अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी केला पाहिजे." तसेच, शिक्षक दिनानिमित्त हा माझा संदेश आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, "एखाद्या देशाचा इतिहास त्याबद्दलच्या विदेशी तपशीलांवर आधारित असू शकत नाही आणि भारतीय लोकांसाठी पौराणिक सूत्रांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. भारतीयांद्वारे घेतलेला भारताचा इतिहास आत्मसात करा." सुब्रमण्यम स्वामींच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थान हा राज्यकारभाराची कला, दरबारीची शैली, युद्धाच्या पद्धती, शेती आधार देखभाल व माहितीचा प्रसार यामध्ये वैचारिकदृष्ट्या एक होता.

दरम्यान, भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच हिंदूंच्या अधिकाराविषयी बोलत असतात. याआधी हिंदुत्वासाठी युद्ध १६ मे २०१४ पासून सुरू झाले, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. दरम्यान, १६ मे २०१४ ला पहिल्यांदा काँग्रेसला पराभूत करून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपाचे सरकार स्थापन करण्यात आले."ब्रिटीश साम्राज्यवादापासून भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध १८५७ मध्ये झाले. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी दुसरे युद्ध झाले. देशातील छुप्या पश्चिमीकरणापासून स्वातंत्र्याचे तिसरे युद्ध १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुरु झाले आणि १६ मे २०१४ रोजी हिंदुत्वासाठी युद्ध सुरू झाले", असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते.

आणखी बातम्या...

- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक    

-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल     

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी