शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 11:10 IST

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते सांगतात; पण वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देभाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही'कोलकातामध्ये 'एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या विषयावर स्वामी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

कोलकाता - भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते सांगतात; पण वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. शनिवारी (23 मार्च ) कोलकातामध्ये 'एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या विषयावर स्वामी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी 'पंतप्रधान मोदी असं का सांगतात, हे मला कळत नाही. जीडीपीनुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे' असं म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. विनिमय दरांमध्ये सतत बदल होत असतात आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने जीडीपी गणनेच्या वैज्ञानिक पद्धतीच्या स्वीकारार्ह प्रक्रियेनुसार भारताची अर्थव्यवस्था ही सध्या सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. क्रयशक्ती क्षमता ही अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या गणनेची योग्य पद्धत आहे आणि त्याआधारे भारत सध्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे, असं ही स्वामी यांनी सांगितलं आहे. 

मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामीमोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही, अशा शब्दात काही महिन्यांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. 'द क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी यासंदर्भात भाष्य केले होते. मुलाखतीच्या सुरुवातीला भाजपा मंत्र्यांवर टीका करणाऱ्या स्वामींना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला होता. हे करताना त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत समजून घेणारा एकही नेता विरोधी पक्षात नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

स्वामी यांनी पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. केवळ अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवरून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, असे स्वामींनी सांगितले होते. मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की अर्थव्यवस्थेतील कामगिरीवरुन कधीच निवडणुका जिंकता येत नाही. हे वाजपेयींनाही जमले नाही की नरसिंह राव किंवा मोरारजी देसाईंना. देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत. आता उर्वरित वर्षांत ते वेगाने पुढे जातील आणि चांगली कामगिरी करतील. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा चांगली कामगिरी करेल असा विश्वास स्वामींनी व्यक्त केला होता. भाजपाला लोकसभा निवडणुकीत 300 च्या आसपास जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते.

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीEconomyअर्थव्यवस्था