शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

ममता बॅनर्जी हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील?; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 17:45 IST

आपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे.

ठळक मुद्देआपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हरिद्वार - आपल्या विधानांमधून नेहमी वाद ओढवून घेणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ‘जय श्री राम’चा नारा दिल्यावर ममता बॅनर्जी तुरूंगात पाठवायची भाषा करतात. असे तर राक्षस हिरण्यकश्यपू करायचा असं साक्षी महाराजांनी म्हटलं आहे. 

साक्षी महाराज यांनी 'पश्चिम बंगालचं नाव ऐकताच मला त्रेता युगाची आठवण होते. जेव्हा राक्षस राज हिरण्यकश्यपूने ‘जय श्री राम’ म्हणण्यावरुन आपल्या मुलाला तुरुंगात टाकलं, त्याला अनेक प्रकारच्या यातना दिल्या. बंगालमध्ये ममता बॅनर्जीही असंच करत आहेत. ‘जय श्री राम’ म्हणण्यावरुन त्या लोकांना तुरुंगात टाकत आहेत. ममता या हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील तर नाही ना?' असं म्हटलं आहे. 

साक्षी महाराज यांना भाजपाने पुन्हा एकदा उन्नाव लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रचारादरम्यान मतदारांना संबोधित करताना साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. मला मतदान करा अन्यथा मी माझी सर्व पापं तुमच्या पदरात टाकेन, तुम्हाला शाप देईन, अशी भीती साक्षी महाराज यांनी मतदारांना दाखवली होती.  साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा साक्षी महाराज यांनी राम मंदिर, प्रियंका गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त विधाने केली आहेत. 

'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवणार : भाजपालोकसभा निवडणुकीत सर्वधिक चर्चेत आलेला पश्चिम बंगाल हे राज्य अजूनही राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत आहे. 'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांनतर भाजपच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आले  होते. त्याला उत्तर देत भाजपाकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार असून त्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी दिली.

पश्चिम बंगालमध्ये  'जय श्री राम'च्या घोषणांमुळे राजकीय युद्ध सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या होत्या. यावेळी पोलिसांनी भाजपाचे 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर भाजप ही आता आक्रमक झाली असून ममता बनर्जी यांना 10 लाख 'जय श्री राम' लिहलेले पोस्टकार्ड पाठवणार आहे. त्याची तयारी सुद्धा झाली असल्याचा खुलासा अर्जुन सिंह यांनी केला आहे.  

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा