शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

“हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जायला केजरीवाल यांनी मदत केली”; भाजप नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 11:30 IST

ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

रांची: 'ईडी'च्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून अचानक गायब झालेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर तब्बल ४० तासांनी रांचीत पोहोचले. यानंतर आता हेमंत सोरेन ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जाण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत केली असा दावा भाजप नेत्याने केला आहे.

ईडीने अनेकदा नोटीस पाठवूनही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याने अखेर ईडी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचली. ईडीने सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून ३६ लाखांची रोकड, दोन कार आणि काही कागदपत्रे जप्त केली. हेमंत सोरेन यांना अटक होण्याची भीती असल्याने ते तुरुंगात जाण्यापूर्वी पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवू शकतात, असे मानले जात आहे, तर राष्ट्रपती राजवटीची शक्यता बळावली आहे.

हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जायला केजरीवाल यांनी मदत केली

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रस्ते मार्गाने दिल्लीतून पळून जाण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत केली. केजरीवाल यांनी वाराणसीपर्यंत जायला हेमंत सोरेन यांची मदत केली. त्यानंतर मिथिलेश कुमार यांनी सोरेन यांना रांचीपर्यंत सहीसलामत पोहोचवले, असा दावा निशिकांत दुबे यांनी केला आहे. निशिकांत दुबे यांच्या विधानावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे IAS अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे. ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) काही आमदार रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले आहेत.  

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल