शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

“हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जायला केजरीवाल यांनी मदत केली”; भाजप नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 11:30 IST

ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

रांची: 'ईडी'च्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून अचानक गायब झालेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर तब्बल ४० तासांनी रांचीत पोहोचले. यानंतर आता हेमंत सोरेन ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जाण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत केली असा दावा भाजप नेत्याने केला आहे.

ईडीने अनेकदा नोटीस पाठवूनही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याने अखेर ईडी हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचली. ईडीने सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून ३६ लाखांची रोकड, दोन कार आणि काही कागदपत्रे जप्त केली. हेमंत सोरेन यांना अटक होण्याची भीती असल्याने ते तुरुंगात जाण्यापूर्वी पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवू शकतात, असे मानले जात आहे, तर राष्ट्रपती राजवटीची शक्यता बळावली आहे.

हेमंत सोरेन यांना दिल्लीतून पळून जायला केजरीवाल यांनी मदत केली

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रस्ते मार्गाने दिल्लीतून पळून जाण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत केली. केजरीवाल यांनी वाराणसीपर्यंत जायला हेमंत सोरेन यांची मदत केली. त्यानंतर मिथिलेश कुमार यांनी सोरेन यांना रांचीपर्यंत सहीसलामत पोहोचवले, असा दावा निशिकांत दुबे यांनी केला आहे. निशिकांत दुबे यांच्या विधानावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे IAS अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे. ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) काही आमदार रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले आहेत.  

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल