शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Political Crisis: “ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:51 IST

Maharashtra Political Crisis: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर असून, दुसरा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, असे भाजप खासदाराने म्हटले आहे.

नवी दिल्ली: एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत असला, तरी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपसह शिंदे गटाला बहुतांश ठिकाणी मोठा विजय मिळाला आहे. यातच आता जनतेनेचे शिंदे गटाला स्विकारलेले असून, आता केवळ कागदोपत्री निर्णय राहिला असल्याची प्रतिक्रिया भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेला कौल दिलाय. लोकांनी बहुमताने या पॅनलच्या सदस्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, तो कागदोपत्री असेल, असे अनिल बोंडे यांनी सांगितले. शिवसेनेचे शिंदे गटातील लोक भाजपासोबत मैत्री करत आहेत, उद्धव ठाकरे गटानेही भाजपसोबत युती केल्यास तिला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. 

भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे

निवडणूक आयोगाचे अधिकारी काय तो निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनतेने निर्णय करून टाकलाय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एक नंबरवर भाजप राहिला आणि दोन नंबरवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची एकनाथ शिंदेंची शिवसेना राहिली. लोकांनी स्वीकारलेय की हा भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, तो कार्यालयीन मॅटर आहे. लोकांच्या मनातले लोकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चंगाल्या प्रकारे दाखवून दिले असल्याचे बोंडे म्हणाले. 

दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे मोठे नुकसात झाले आहे. विदर्भात गडचिरोली, अमरावती, वर्धेत मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि विदर्भापर्यंत खूप नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी तत्काळ एनडीआरएफची टीमही पाठवली. मात्र यावेळी एनडीआरएफची मदतच मिळून उपयोग नाही  तर पायाभूत सुविधांचं नुकसान झालेय. पूल वाहून गेलेत, जमीन खरडून गेलीय. यासाठी मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा बोंडे यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAnil Bondeअनिल बोंडे