शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

गोरक्षकांनी मारहाण केलेल्या दलितांनी केला हिंदू धर्माचा त्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 08:46 IST

गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती.

अहमदाबाद: गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरूण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग केला आहे. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी रविवारी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. या सोहळ्यात भिक्खुंकरवी 400 दलितांना बौद्ध धर्माची शपथ देण्यात आली. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यातंर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर या दलित कुटुंबीयांच्या धर्मांतराला अधिकृत मान्यता मिळेल. गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती. गोरक्षकांच्या टोळक्याने त्यांची धिंड काढली होती, तसेच त्यांना एका कारला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावरून केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काल या तरूणांनी अन्य काही दलित बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. तत्पूर्वी 25 एप्रिलला रमेश सरवय्या आणि अशोक सरवय्या यांच्यावर गोरक्षकांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला होता. 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेले हे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. यावेळी आरोपींकडून रमेश व अशोक यांना त्यांच्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली. मात्र, त्याला नकार दिल्यानंतर आरोपी किरणसिंह दरबार व त्याच्या साथीदारांनी या दोघांवर हल्ला केला होता. मात्र, याठिकाणी लोक जमल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढावा लागला. दरम्यान बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर पीडित तरूणांचे वडील बाळू सरवय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आज मला मुक्त आणि सामर्थ्यशाली वाटत आहे. मी अंध रूढींना मुठमाती दिली आहे. ही भावनाच किती मुक्ततेची जाणीव करून देणारी आहे. मला मारहाण झाल्यानंतर माझ्यावर काही गोष्टींचे ओझे आहे, असे मला वाटत होते. मात्र, आता मी हे सर्व ओझे भिरकावून दिले आहे. यापुढे आम्हाला हवे ते करण्यापासून कोणताही देव किंवा देवता रोखू शकणार नाही. आम्ही शिक्षण घेऊ, स्वत:ला सुशिक्षित करू आणि योग्य तो व्यवसाय निवडू, असे बाळू सरवय्या यांनी सांगितले. 

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचार