शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपचे २०२४चे एकच मिशन; प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मते, लोकसभेची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:14 IST

अयोध्येतील सोहळ्याशी प्रत्येकाला जोडून घेणार.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा मंत्र देताना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. गरीब, शेतकरी, महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची मते वाढवावीत, असेही त्यांनी म्हटले. 

नवी दिल्लीत शनिवारपासून सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय पदाधिकारी व प्रदेश नेत्यांच्या बैठकीचा आज अखेरचा दिवस होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावेळी संबोधित केले. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भाजपच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आता लक्ष्य समोर ठेवून मिशन मोडवर काम करावे लागेल. सर्व लोकसभा जागांवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे लागेल.

५०० वर्षांनंतरच्या संघर्षानंतरचा कार्यक्रम 

शनिवारी सुमारे ६ तास चाललेली बैठक सकाळी १० वाजता सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप नेत्यांना सांगितले की, २०२४ चा विजय एवढा मोठा व ऐतिहासिक असला पाहिजे की, विरोधकांनी आम्हाला आव्हान देण्यापूर्वी १० वेळा विचार केला पाहिजे. या विजयासाठी सर्वांना युद्धपातळीवर काम करावे लागेल. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नेता, कार्यकर्त्याला सहभागी करून घेतले पाहिजे. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी यावेळी संबोधित केले. त्यांनी या कार्यक्रमाशी संबंधित कार्यक्रमात देशभरातील लोकांना जोडण्याचे आवाहन केले. श्रीराम मंदिर आंदोलन भाजपने हाती घेतलेले मोठे आंदोलन आहे. श्रीराम मंदिराचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. 

महाराष्ट्रात मोठा विजय मिळविण्याचा दावा

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी राज्यनिहाय लोकसभा जागांची स्थिती व जिंकण्याच्या शक्यता, यावर चर्चा झाली. सर्व भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील मतदारसंघांचा आढावा सादर केला. संभाव्य युती करण्यासाठी सहयोगी पक्षांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीने लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळण्याचा दावा करण्यात आला. 

१६० उमेदवारांची जानेवारीत घोषणा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १६० जागा जिंकण्याची तयारी भाजपने मागील पाच वर्षांपासून सुरू केली होती. त्या जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजप पुढील महिन्यात २२ जानेवारीनंतर कधीही करू शकतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्येही लवकर उमेदवारांची घोषणा केल्याचा भाजपला फायदा मिळाला होता.

 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण