शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

भाजपचे २०२४चे एकच मिशन; प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मते, लोकसभेची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:14 IST

अयोध्येतील सोहळ्याशी प्रत्येकाला जोडून घेणार.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा मंत्र देताना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. गरीब, शेतकरी, महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची मते वाढवावीत, असेही त्यांनी म्हटले. 

नवी दिल्लीत शनिवारपासून सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय पदाधिकारी व प्रदेश नेत्यांच्या बैठकीचा आज अखेरचा दिवस होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावेळी संबोधित केले. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भाजपच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आता लक्ष्य समोर ठेवून मिशन मोडवर काम करावे लागेल. सर्व लोकसभा जागांवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे लागेल.

५०० वर्षांनंतरच्या संघर्षानंतरचा कार्यक्रम 

शनिवारी सुमारे ६ तास चाललेली बैठक सकाळी १० वाजता सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप नेत्यांना सांगितले की, २०२४ चा विजय एवढा मोठा व ऐतिहासिक असला पाहिजे की, विरोधकांनी आम्हाला आव्हान देण्यापूर्वी १० वेळा विचार केला पाहिजे. या विजयासाठी सर्वांना युद्धपातळीवर काम करावे लागेल. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नेता, कार्यकर्त्याला सहभागी करून घेतले पाहिजे. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी यावेळी संबोधित केले. त्यांनी या कार्यक्रमाशी संबंधित कार्यक्रमात देशभरातील लोकांना जोडण्याचे आवाहन केले. श्रीराम मंदिर आंदोलन भाजपने हाती घेतलेले मोठे आंदोलन आहे. श्रीराम मंदिराचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. 

महाराष्ट्रात मोठा विजय मिळविण्याचा दावा

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी राज्यनिहाय लोकसभा जागांची स्थिती व जिंकण्याच्या शक्यता, यावर चर्चा झाली. सर्व भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील मतदारसंघांचा आढावा सादर केला. संभाव्य युती करण्यासाठी सहयोगी पक्षांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीने लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळण्याचा दावा करण्यात आला. 

१६० उमेदवारांची जानेवारीत घोषणा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १६० जागा जिंकण्याची तयारी भाजपने मागील पाच वर्षांपासून सुरू केली होती. त्या जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजप पुढील महिन्यात २२ जानेवारीनंतर कधीही करू शकतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्येही लवकर उमेदवारांची घोषणा केल्याचा भाजपला फायदा मिळाला होता.

 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण