शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दलितांच्या घरी जेवल्याने काही होणार नाही, सरसंघचालकांनी खेचले भाजपाचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 11:24 IST

दलित समुहाची उन्नती करण्यासाठी इतकं पुरेसं नाही.

नवी दिल्ली- भाजपाचे नेते दलित समुहातील लोकांच्या घरी जातात, त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर जेवतात. पण दलित समुहाची उन्नती करण्यासाठी इतकं पुरेसं नाही. नेत्यांनी दलित समुहातील लोकांना स्वतःच्या घरी बोलवायला हवं, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

फक्त दलित व्यक्तीच्या घरी जाणं पुरेसं नाही. ही पद्धत दोन्ही बाजुंने असावी. ज्या प्रमाणे दलित लोक आपल्याला त्यांच्या घरी बोलावून आपलं स्वागत करतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या घरी त्यांचं स्वागत करायला हवं, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या संघाच्या एका बैठकीत केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्राम स्वराज अभियानाचा भाग म्हणून काही आठवड्यांपूर्वी भाजपाच्या काही नेत्यांनी दलित समुहातील लोकांच्या घरी भेट दिली तसंच त्यांच्याबरोबर जेवणं केलं. सामाजिक सलोख्यासाठी भाजपाच्या नेत्यांच्या या भेटी होत्या.  अष्टमीच्या दिवशी आपण दलित समुहातील मुलांना घरी बोलावून त्यांची पूजा करतो. पण आपण आपल्या मुलींना त्यांच्या घरी पाठवू का? असा प्रश्नही मोहन भागवत यांनी विचारला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली युनिटचे सहअध्यक्ष आलोक कुमार यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शविली आहे. फक्त दलित लोकांच्या घरी जेवल्याने सामाजिक सलोखा निर्माण होणार नाही. समुहाच्या प्रगती आणि प्रतिष्ठेसाठीही काम करावं लागेल. दलितांच्या घरी जाण्याने ते लोक खुश होतील असं जर कोणाला वाटत असेल, तर तो पूर्णपणे अहंकार आहे. तुम्ही जर दलितांना तुमच्या कुटुंबाचा भाग मानत असाल तर हाच सामाजिक सलोखा आहे, असं आलोक कुमार यांनी म्हटलं.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपा