शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दलितांच्या घरी जेवल्याने काही होणार नाही, सरसंघचालकांनी खेचले भाजपाचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 11:24 IST

दलित समुहाची उन्नती करण्यासाठी इतकं पुरेसं नाही.

नवी दिल्ली- भाजपाचे नेते दलित समुहातील लोकांच्या घरी जातात, त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर जेवतात. पण दलित समुहाची उन्नती करण्यासाठी इतकं पुरेसं नाही. नेत्यांनी दलित समुहातील लोकांना स्वतःच्या घरी बोलवायला हवं, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

फक्त दलित व्यक्तीच्या घरी जाणं पुरेसं नाही. ही पद्धत दोन्ही बाजुंने असावी. ज्या प्रमाणे दलित लोक आपल्याला त्यांच्या घरी बोलावून आपलं स्वागत करतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या घरी त्यांचं स्वागत करायला हवं, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या संघाच्या एका बैठकीत केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्राम स्वराज अभियानाचा भाग म्हणून काही आठवड्यांपूर्वी भाजपाच्या काही नेत्यांनी दलित समुहातील लोकांच्या घरी भेट दिली तसंच त्यांच्याबरोबर जेवणं केलं. सामाजिक सलोख्यासाठी भाजपाच्या नेत्यांच्या या भेटी होत्या.  अष्टमीच्या दिवशी आपण दलित समुहातील मुलांना घरी बोलावून त्यांची पूजा करतो. पण आपण आपल्या मुलींना त्यांच्या घरी पाठवू का? असा प्रश्नही मोहन भागवत यांनी विचारला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली युनिटचे सहअध्यक्ष आलोक कुमार यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शविली आहे. फक्त दलित लोकांच्या घरी जेवल्याने सामाजिक सलोखा निर्माण होणार नाही. समुहाच्या प्रगती आणि प्रतिष्ठेसाठीही काम करावं लागेल. दलितांच्या घरी जाण्याने ते लोक खुश होतील असं जर कोणाला वाटत असेल, तर तो पूर्णपणे अहंकार आहे. तुम्ही जर दलितांना तुमच्या कुटुंबाचा भाग मानत असाल तर हाच सामाजिक सलोखा आहे, असं आलोक कुमार यांनी म्हटलं.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपा