शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"भाजपाने पहिल्या यादीतच पराभव स्वीकारला, बंडखोरीच्या भीतीने..."; अखिलेश यादवांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:53 IST

Akhilesh Yadav And BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने 195 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने 195 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने बंडखोरीच्या भीतीने अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कायम ठेवल्याने त्यांनी पराभव स्वीकारल्याचं या यादीवरून दिसून येतं असं म्हटलं आहे. 

भाजपाने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यात यूपीमधील 51 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत यूपीतील बहुतांश जुन्या नावांचा समावेश असला तरी दिल्लीच्या पाच विद्यमान खासदारांपैकी चार खासदारांची तिकिट कापण्यात आलं आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, रमेश बिधुरी यांच्या नावांचा समावेश आहे.

भाजपाच्या या यादीबाबत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, "भाजपाच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रथमदर्शनी दिसून येते की, ही यादी फक्त त्या 195 जागांवर आली आहे जिथे भाजपाच्या विजयाची थोडीच शक्यता आहे. भाजपाने पहिल्या यादीतच आपला पराभव स्वीकारला आहे कारण बंडखोरीच्या भीतीमुळे, ते अशा लोकांना पुन्हा उमेदवारी देत ​​आहे जे त्यांच्या संबंधित लोकसभा मतदारसंघात कोणतेही काम करत नाहीत किंवा भ्रष्टाचारामुळे त्यांनाच त्यांच्या तिकिटाची आशा नव्हती."

"जे इथून निघू पाहत होते त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पुन्हा लढण्यास सांगितले जात आहे. ही यादी आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्येही घोर निराशा झाली आहे, कारण त्यांना आपल्या बहुतांश खासदारांविरोधात वारे वाहत असल्याची जाणीव आहे. जे युवा भाजपा तिकीटाच्या आशेने भाजपाच्या प्रत्येक चुकीच्या कामाला पाठिंबा देत आहेत. तेही निराश होऊन निष्क्रिय होतील. भाजपाची उमेदवारांची यादी म्हणजे भाजपाची निराशाच आहे" असं देखील अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. 

निवडणूक आयोग या महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार असून एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या, परंतु सध्या पक्षाकडे 290 खासदार आहेत. अलीकडेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काही खासदारांनी राजीनामे दिले होते, त्यामुळे संख्या घटली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाPoliticsराजकारणAkhilesh Yadavअखिलेश यादव