शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

तिसऱ्या टर्मसाठी नवीन टीमसह मैदानात उतरणार पीएम मोदी, 70 खासदारांना मिळणार डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 14:28 IST

आगामी लोकसभा निवडणुकी खराब कामगिरी करणाऱ्या भाजपाच्या अनेक खासदारांना तिकीट नाकारले जाणार आहे.

BJP LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. काल, म्हणजेच 29 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिनीची बैठक पार पडली, ज्यात भाजप उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यंदा भाजपा अनेक खासदारांची तिकिटे कापण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने भाजप खासदारांकडून त्यांच्या कामाचा अहवाल मागवला जात होता. या अहवालाच्या आधारे अनेकांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

60-70 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाणार

सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत ज्या खासदारांची कामगिरी चांगली नाही, त्यांची तिकिटे इतर उमेदवारांना दिली जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा भाजपाच्या 60-70 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. तीनदा विजयी झालेल्या अनेक जुन्या खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. गेल्यावेळीप्रमाणे यंदाही अनेक ओबीसी खासदारांना तिकीट दिले जाणार आहे. 2019 मध्ये भाजपचे 303 पैकी 85 ओबीसी खासदार विजयी झाले होते. 

प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हेगेल्या दोन वर्षांपासून सातत्याने भाजप खासदारांकडून त्यांच्या कामाचा अहवाल मागवला जात होता. सर्वेक्षण संस्थांद्वारे प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची रिपोर्ट तयार करण्यात आली. भाजपशासित राज्यांमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राज्यातील मंत्र्यांना ड्युटी लावण्यात आली होती. या मंत्र्यांना लोकसभेच्या जागांना भेट देऊन खासदारांचा अहवाल घेण्यास सांगण्यात आले होते. मंत्री व संघटनेकडून प्राप्त झालेला अहवाल राज्यस्तरावरील निवडणूक समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. यासोबतच संघाच्या सरचिटणीसांकडून आरएसएसचा अभिप्रायही देण्यात आला.

जागेनुसार रणनीती तयार केलीकेंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी गुरुवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची दीर्घ बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यनिहाय उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. भाजपने प्रत्येक जागेनुसार रणनीती तयार केली आहे. प्रत्येक जागा जिंकण्यासाठी सर्वोत्तम उमेदवार कोण असू शकतो, हे पाहिले जात आहे. दुसऱ्या पक्षातील उमेदवारांना भाजपमध्ये आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले. सर्व बाजूने विचार करुन कोणत्याही क्षणी भाजपा आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण