शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

येडियुरप्पा यांना हिरवा कंदिल देताना भाजप नेत्यांनी बाळगली कमालीची सावधगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 05:30 IST

दिल्लीहून एकही बडा नेता त्यांच्या शपथविधीसाठी आला नव्हता.

बंगळुरू : गुरुवारी मध्यरात्रीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा बी. एस. येडियुरप्पा यांना फोन आला आणि येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद निश्चित झाले, असे स्पष्ट झाले आहे. येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाला हिरवा कंदिल दाखवताना, तूर्त तुम्हीच फक्त शपथ घ्या, मंत्रिमंडळाचा विस्तार बहुमत सिद्ध झाल्यानंतर करा, असे त्यांना अमित शहा यांनी सांगितले, तसेच बहुमत सिद्ध करण्याची तुम्हाला खात्री आहे का, असा प्रश्नही शहा यांनी येडियुरप्पा यांना केल्याचे समजते.येडियुरप्पा यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी तीन दिवसांत त्यांना जसा राजीनामा द्यावा लागला, तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी केंद्रीय नेत्यांना लगेच शपथविधी नको होता; पण आपण बहुमत सिद्ध करू, अशी खात्री येडियुरप्पा यांनी दिली. रात्री त्यांना फोन करण्यापूर्वी शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतही जाणून घेतले आणि हिरवा कंदिल दाखवला.येडियुरप्पा यांना खरोखरच बहुमत सिद्ध करता येईल का, याविषयी नेत्यांना शंका असल्याने येडियुरप्पा यांनी एकट्याने शपथ घेण्याचा तोडगा काढला.येडियुरप्पा यांना राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याचे निमंत्रण विरोधी पक्षाच्या नेत्यांना तर सोडाच, पण पक्षाच्या अनेक आमदार व नेत्यांनाही नव्हते. दिल्लीहून एकही बडा नेता त्यांच्या शपथविधीसाठी आला नव्हता. (वृत्तसंस्था)- कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर येडियुरप्पा लगेचच सरकार स्थापनेचा दावा करतील, अशी अपेक्षा होती; पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घाई करू नका आणि दिल्लीत या, असा निरोप दिला.- येडियुरप्पा दिल्लीत गेले, नेत्यांना भेटून बंगळुरूला परतले; पण अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही. त्यामुळे भाजपचे आमदार अस्वस्थ होते.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण