शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

संकटाच्या काळात भाजपचे नेते गायब होतात; राज्यात चक्रीवादळ आले तेव्हा कुठे होते? ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:41 IST

पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात.

गडबेता (प. बंगाल) : अम्फान चक्रीवादळानंतर आमच्या सरकारने लोकांना सर्वतोपरी मदत केली. मात्र, भाजपचे नेते संकटाच्या काळात कुठेच दिसले नाहीत, अशा शब्दांत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. (BJP leaders disappear in times of crisis Mamata's attack)पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना तृणमूलच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली. एखादा अपवाद असू शकतो. मात्र, आम्ही लोकांच्या मदतीसाठी पोहोचलो तेव्हा भाजपचे लोक कुठे होते, असा सवाल करून त्या म्हणाल्या की, संकटाच्या काळात ते नेहमीच गायब असतात. प. बंगालमध्ये एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) लागू होऊ देणार नाही. कारण, नोंदणी करताना लोक जर घरी नसतील, तर भाजप मतदारांची नावे हटवून टाकेल. देशातील कोणत्याही नागरिकाला प. बंगालमधून बाहेर काढले जाणार नाही. भाजप हा दंगेखोरांची पार्टी आहे, असे सांगत त्या म्हणाल्या की, आम्हाला हिंसा नकोय. रक्तपात नकोय. राज्यात सूडाचे राजकारण आम्हाला नकोय. 

मुकुल रॉय वीस वर्षांनंतर विधानसभेच्या रिंगणात- भारतीय जनता पक्षाने अखेरच्या चार टप्प्यांमधील १५९ पैकी १४८ उमेदवारांची यादी गुरुवारी जारी केली. त्यात तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे हेवीवेट नेते मुकुल रॉय व त्यांचे चिरंजीव शुभ्रांगशू, आणखी की विद्यमान खासदार जगन्नाथ सरकार आदींचा समावेश आहे. 

- मुकुल रॉय हे वीस वर्षांनंतर विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकत्यामधील भवानीपूर मतदारसंघात भाजपने अभिनेता रूद्रनील घोष यांना उतरवले आहे. त्यांचा सामना तृणमूलचे ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्याशी आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा