शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोल! झारखंडमधील सत्ता जाण्याच्या शक्यतेने भाजप नेते अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 07:12 IST

एक्झिट पोल । उद्या लागणार निकाल

रांची : महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही. मात्र, तिथे कदाचित कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि विधानसभा त्रिशंकू असू शकेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. या अंदाजामुळे भाजपचे नेते अस्वस्थ दिसत आहेत.

झारखंडमधील विधानसभेच्या ९१ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान झाले. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार या राज्यात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांना मिळून ३८ ते ५0 जागा मिळू शकतील. सध्या सत्तेत असलेल्या भाजप व मित्रपक्षांना मिळून २२ ते ३२ जागा मिळू शकतील, असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. राज्यातील आॅल झारखंड स्टुडंटस् युनियन (एजेएसयू) ला ३ ते ५, झारखंड विकास मोर्चाला २ ते ४ आणि अन्य यांना ४ ते ५ जागा मिळू शकतील, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे. अर्थात यातील काही पक्षांच्या मदतीनेच भाजपने २0१४ साली सरकार स्थापन केले होते. भाजपला २0१४ सालीही स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे यावेळीही भाजप या पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न करील. त्यापैकी एजेएसयू हा पक्ष सरकारमध्ये भाजपसह सहभागी होता; पण त्या पक्षाने निवडणूक मात्र स्वतंत्रपणे लढवली.

आयएएनएस-सी व्होटर यांच्या एक्झिट पोलमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीला मिळून ३१ ते ३९, तर भाजप व मित्रपक्षांना मिळून २८ ते ३६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाला आहे. एजेएसयूला ७, तर विकास मोर्चाला १ ते ४ जागा मिळतील, असे या पोलमधून दिसते. त्यामुळे त्रिशंकू विधानसभा, काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता, की लहान पक्षांना आयत्या वेळी आपल्याकडे खेचून पुन्हा भाजप, अशी चर्चा सुरू झाली आहे. आदिवासीबहुल झारखंडमध्ये भाजपने रघुबर दास या बिगर आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री केल्याने राज्यात नाराजी होती. त्यामुळे लोकांनी यंदा भाजपकडे पाठ वळवली, असे एक्झिट पोल सांगतात. (वृत्तसंस्था)आणखी एक राज्य हातातून जाणार?च्गेल्या वर्षी मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तराखंड ही राज्ये भाजपकडून गेली. यावर्षी भाजपला महाराष्ट्राची सत्ता मिळवता आली नाही.च्आता झारखंडमधील सत्ता काँग्रेस व मित्रपक्षांना मिळाल्यास तो भाजपसाठी मोठाच धक्का असेल. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार प्रचार केला होता.च्पंतप्रधान मोदी यांच्या नावानेच भाजपने ही निवडणूक लढवली होती.

टॅग्स :Jharkhandझारखंडranchi-pcरांचीBJPभाजपाElectionनिवडणूक