शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'राजीव गांधी हेच राहुल यांचे वडील असल्याचा पुरावा काय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:34 IST

भाजपा नेते विनय कटियार यांनी विजय शंखनाद सभेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देभाजपा नेते विनय कटियार यांनी विजय शंखनाद सभेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.'राहुल गांधींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सोनिया गांधी यांनी त्यांना राजीव गांधी तुझे वडील आहेत असं सांगितलं असेल. जर याचा पुरावा मागितला तर तुम्ही सांगू शकाल का?''आपल्या गर्भातून दहशतवादाला जन्म देण्याचं एकच काम काँग्रेस पक्ष करतो'

नवी दिल्ली - भाजपा नेते विनय कटियार यांनी विजय शंखनाद सभेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'पुलवामा घटनेत आमचे 45 सैनिक शहीद झाले आणि आज काँग्रेस याचे पुरावे मागत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीचा पुरावा मागत आहात? जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हाच तोच त्या बाळाचा बाप आहे, याची खात्री आईच देते. राहुल गांधींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सोनिया गांधी यांनी त्यांना राजीव गांधी तुझे वडील आहेत असं सांगितलं असेल. जर याचा पुरावा मागितला तर तुम्ही सांगू शकाल का, असा सवाल विनय कटियार यांना केला आहे. उत्तर प्रदेशमधील बस्तीमध्ये विजय शंखनाद सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. 

'आपल्या गर्भातून दहशतवादाला जन्म देण्याचं एकच काम काँग्रेस पक्ष करतो. लष्कराचे जवान कोणाचेही सरकार येईल तेव्हा बुलेटप्रुफ जॅकेट मागत असतं. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक लाख बुलेटप्रुफ जॅकेट मागवले. किमान सीमेवर लढताना सैनिकांना सुरक्षा कवच तर मिळाले. जी-जी चांगली कामे झाली ती सर्व भाजपाने केली आहेत' असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे. 

'ज्यांच्या खिशात पाच रूपये नव्हते. त्यांना उपचारासाठी पाच लाख रूपये देण्याचे काम मोदींनी केले आहे. देशात दहशतवाद पसरवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसमुळेच देशात अफझल गुरूसारखी माणसं तयार झाली. आता राहुल गांधी ती परंपरा पुढे चालवत आहेत' असंही कटियार यांनी सांगितलं. तसेच त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावरही टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी - अमित शहा 

पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून एअर स्ट्राईक केला गेला यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांना कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवीत? भारतीय हवाई दलाच्या धाडसावर एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्न नाही. राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, शहीदांच्या कुटुंबियांची आणि भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे असा हल्लाबोल काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला होता. भाजपा मुख्यालयात अमित शहा यांची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये ते बोलत होते. 

'जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारताच्या विरोधात नारेबाजी होते तेव्हा काँग्रेस त्या गोष्टीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा देते आणि पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईकने उत्तर दिले जाते तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही किती दुर्दैवी घटना आहे  पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत आहे' असं अमित शहा यांनी म्हटले होते. तसेच दहशतवाद्यांना उत्तर देण्याची गरज नाही काय, असा सवालही त्यांनी राहुल गांधी यांना केला होता. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी