शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

“देशात दररोज १४ लोकं आत्महत्या करतायत, ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:40 IST

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि ऋषि अग्रवालसारखे भ्रष्टाचारी आरामात जगत असून, कर्जाचा डोंगर झालेले देशवासी आत्महत्या करतायत.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज असलेले नेते असलेले वरुण गांधी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यातच आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

गुजरातमधील एबीजी शिपयार्ड घोटाळा उघड झाल्यानंतर आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाभ्रष्ट व्यवस्थावर एक ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा असल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. एक ट्विट करत वरुण गांधींनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

भ्रष्टाचारी लोक ऐशोआरामात जगत

विजय मल्ल्या ९ हजार कोटी, नीरव मोदी १४ हजार कोटी, ऋषि अग्रवाल २३ हजार कोटी अशी आकडेवारी देत, आज देशात दररोज सुमारे १४ जण कर्जाच्या ओझ्याखाली असलेले आत्महत्या करत असताना उपरोक्त धनवान लोकं वैभवाच्या शिखरावर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर ‘मजबूत सरकार’ ऐवजी ‘मजबूत कार्यवाही’ करण्याची अपेक्षा आहे, असे वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, उद्योगपती विजय मल्ल्यावर अनेक बँकाकडून घेतलेले ९ हजार कोटी कर्ज न चुकवल्याचा आरोप आहे. तसेच नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप आहे. नुकताच एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे माजी चेअरमन ऋषी अग्रवालचे नाव समोर आले आहे. अग्रवालने २२ हजार ८४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण