शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

“देशात दररोज १४ लोकं आत्महत्या करतायत, ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:40 IST

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि ऋषि अग्रवालसारखे भ्रष्टाचारी आरामात जगत असून, कर्जाचा डोंगर झालेले देशवासी आत्महत्या करतायत.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज असलेले नेते असलेले वरुण गांधी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यातच आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

गुजरातमधील एबीजी शिपयार्ड घोटाळा उघड झाल्यानंतर आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाभ्रष्ट व्यवस्थावर एक ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा असल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. एक ट्विट करत वरुण गांधींनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

भ्रष्टाचारी लोक ऐशोआरामात जगत

विजय मल्ल्या ९ हजार कोटी, नीरव मोदी १४ हजार कोटी, ऋषि अग्रवाल २३ हजार कोटी अशी आकडेवारी देत, आज देशात दररोज सुमारे १४ जण कर्जाच्या ओझ्याखाली असलेले आत्महत्या करत असताना उपरोक्त धनवान लोकं वैभवाच्या शिखरावर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर ‘मजबूत सरकार’ ऐवजी ‘मजबूत कार्यवाही’ करण्याची अपेक्षा आहे, असे वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, उद्योगपती विजय मल्ल्यावर अनेक बँकाकडून घेतलेले ९ हजार कोटी कर्ज न चुकवल्याचा आरोप आहे. तसेच नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप आहे. नुकताच एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे माजी चेअरमन ऋषी अग्रवालचे नाव समोर आले आहे. अग्रवालने २२ हजार ८४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण