शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

“देशात दररोज १४ लोकं आत्महत्या करतायत, ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:40 IST

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि ऋषि अग्रवालसारखे भ्रष्टाचारी आरामात जगत असून, कर्जाचा डोंगर झालेले देशवासी आत्महत्या करतायत.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज असलेले नेते असलेले वरुण गांधी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यातच आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

गुजरातमधील एबीजी शिपयार्ड घोटाळा उघड झाल्यानंतर आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाभ्रष्ट व्यवस्थावर एक ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा असल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. एक ट्विट करत वरुण गांधींनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

भ्रष्टाचारी लोक ऐशोआरामात जगत

विजय मल्ल्या ९ हजार कोटी, नीरव मोदी १४ हजार कोटी, ऋषि अग्रवाल २३ हजार कोटी अशी आकडेवारी देत, आज देशात दररोज सुमारे १४ जण कर्जाच्या ओझ्याखाली असलेले आत्महत्या करत असताना उपरोक्त धनवान लोकं वैभवाच्या शिखरावर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर ‘मजबूत सरकार’ ऐवजी ‘मजबूत कार्यवाही’ करण्याची अपेक्षा आहे, असे वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, उद्योगपती विजय मल्ल्यावर अनेक बँकाकडून घेतलेले ९ हजार कोटी कर्ज न चुकवल्याचा आरोप आहे. तसेच नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप आहे. नुकताच एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे माजी चेअरमन ऋषी अग्रवालचे नाव समोर आले आहे. अग्रवालने २२ हजार ८४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण