शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 11:53 IST

भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरPOK वर ताबा मिळवणे व बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे विसरून जा - स्वामीमित्र कसे गमवायचे आणि शत्रू वाढवायचे, यावर मोदींनी पुस्तक लिहावे - स्वामी

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन बलुचिस्तानमधून केले जात होते. मात्र, आता भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत या दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे. (bjp leader subramanian swamy says now forget to getting pok and liberating balochistan)

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) ट्विटरवर कायम सक्रीय असतात. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 

POK वर ताबा मिळवणे विसरा

एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना  POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. 

२०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे

अलीकडेच खासदार स्वामी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे कसे साध्य होईल, याच्या युक्त्यांवर पुस्तक लिहावे, असा टोला स्वामी यांनी लगावला होता. चीन आणि पाकिस्तानच्या धोरणांमुळे नेपाळ, भूटान आणि श्रीलंका यांसारखे मित्र गमावत चाललो आहोत, असा आरोप स्वामी यांनी केला होता. 

दरम्यान, तजाकिस्तान येथे होणाऱ्या हार्ट ऑफ आशिया संमेलनात भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत. परंतु, दोन्ही देशांमध्ये चर्चेचा कोणताही कार्यक्रम ठरवण्यात आलेला नाही. कारण पाकिस्तानकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारतPakistanपाकिस्तान