शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 11:53 IST

भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरPOK वर ताबा मिळवणे व बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे विसरून जा - स्वामीमित्र कसे गमवायचे आणि शत्रू वाढवायचे, यावर मोदींनी पुस्तक लिहावे - स्वामी

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन बलुचिस्तानमधून केले जात होते. मात्र, आता भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत या दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे. (bjp leader subramanian swamy says now forget to getting pok and liberating balochistan)

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) ट्विटरवर कायम सक्रीय असतात. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 

POK वर ताबा मिळवणे विसरा

एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना  POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. 

२०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे

अलीकडेच खासदार स्वामी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे कसे साध्य होईल, याच्या युक्त्यांवर पुस्तक लिहावे, असा टोला स्वामी यांनी लगावला होता. चीन आणि पाकिस्तानच्या धोरणांमुळे नेपाळ, भूटान आणि श्रीलंका यांसारखे मित्र गमावत चाललो आहोत, असा आरोप स्वामी यांनी केला होता. 

दरम्यान, तजाकिस्तान येथे होणाऱ्या हार्ट ऑफ आशिया संमेलनात भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत. परंतु, दोन्ही देशांमध्ये चर्चेचा कोणताही कार्यक्रम ठरवण्यात आलेला नाही. कारण पाकिस्तानकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारतPakistanपाकिस्तान