शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 11:53 IST

भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेरPOK वर ताबा मिळवणे व बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे विसरून जा - स्वामीमित्र कसे गमवायचे आणि शत्रू वाढवायचे, यावर मोदींनी पुस्तक लिहावे - स्वामी

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन बलुचिस्तानमधून केले जात होते. मात्र, आता भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत या दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे. (bjp leader subramanian swamy says now forget to getting pok and liberating balochistan)

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) ट्विटरवर कायम सक्रीय असतात. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 

POK वर ताबा मिळवणे विसरा

एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना  POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. 

२०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे

अलीकडेच खासदार स्वामी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे कसे साध्य होईल, याच्या युक्त्यांवर पुस्तक लिहावे, असा टोला स्वामी यांनी लगावला होता. चीन आणि पाकिस्तानच्या धोरणांमुळे नेपाळ, भूटान आणि श्रीलंका यांसारखे मित्र गमावत चाललो आहोत, असा आरोप स्वामी यांनी केला होता. 

दरम्यान, तजाकिस्तान येथे होणाऱ्या हार्ट ऑफ आशिया संमेलनात भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत. परंतु, दोन्ही देशांमध्ये चर्चेचा कोणताही कार्यक्रम ठरवण्यात आलेला नाही. कारण पाकिस्तानकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारतPakistanपाकिस्तान