शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 18:37 IST

काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बुधवारी मणिपूरसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर जबरदस्त भडकल्या. यावेळी काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला. त्यांनी हा आरोप प्रश्नोत्तराच्या तासात केला. अमी याज्ञिक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नावेळी महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महिला सहकारी मणिपूरच्या मुद्द्यावर केव्हा बोलणार? असा प्रश्न केला होता. 

यावर स्मृती इराणी संतापल्या आणि म्हणाल्या माझा यावर तीव्र आक्षेप आहे. केवळ महिला मंत्र्यांनीच नाही, तर महिला राजकीय नेत्यांनीही मणिपूरसह छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमधील घटनांवरही लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्या म्हणाल्या. एवढेच नाही, तर या राज्यांतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांसंदर्भात बोलण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे (काँग्रेस सदस्य याज्ञिक) आहे का? असा प्रति प्रश्नही त्यांनी यावेळी केला. 

स्मृती म्हणाल्या, ‘‘आपल्यात छत्तीसगडसंदर्भात बोलण्याची हिंमत आणि सामर्थ्य आहे? राजस्थानबद्दल बोलायची हिंमत आहे? बिहारसंदर्भात बोलायची हिंमत आहे? लाल डायरीबद्दल बोलण्याची हिम्मत आहे? एवढेच नाही, तर आपल्यात हे बोलण्याचे धाडक केव्हा येईल की, एक काँग्रेस नेते तेथे गेल्यानंतर, मणिपूर जळायला सुरुवात झाली. राहुल गांधींनी मणिपूरला कसे आगीत ढकलले, हे सांगण्याची हिंमत केव्हा होईस?" अशे सवालही त्यांनी यावेळी केले.याचवेळी, ‘‘काँग्रेसशासित राज्यांतील बलात्काराच्या घटनांवर बोलाण्याची आपली हिंमत आहे? तर आपण या घटनांवर बोलू शकत नसाल, तर केंद्रातील महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नका," असा सल्लाही स्मृती इराणी यांनी याज्ञिक यांना दिला.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस