शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला, भाजपच्या 'या' बड्या नेताचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 13:10 IST

"मोदी सरकारने यूपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आणखी वाढवली, आता अधिकांश भारतीय माझ्या बोलण्याशी सहमत..."

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरला घरचा आहेर दिला आहे.स्वामी यांनी ट्विट केले आहे, की आता अधिकांश भारतीय माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत.यापूर्वीही स्वामींनी चीन, कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था आदी विषयावर आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरला घरचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी ट्विट करत, मोदी सरकार आर्थिक आघाडीवर अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकारनेही अर्थव्यवस्थेचा पार विचका केला. माझ्या या बेलण्याला अधिकांश भारतीय लोक सहमत आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. (BJP leader MP Subramanyam Swami said Narendra Modi government too has lost its economy most indians agree with me)

स्वामी यांनी ट्विट केले आहे, की आता अधिकांश भारतीय माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत, की मोदी सरकारने यूपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आणखी वाढवली आहे. ही अर्थव्यवस्था अजूनही सुधारली जाऊ शकते. मात्र, सध्या हे कसे करायचे, हे सरकारला माहित नाही. यापूर्वीही स्वामींनी चीन, कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था आदी विषयावर आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

मोदी सरकारला सापडला निधी मिळवण्याचा 'महामार्ग'; तब्बल ८५ हजार कोटी उभारणार

स्वामींच्या या अर्थव्यवस्थेसंदर्भातील ट्विटवर अनेक लोकांनी कमेन्ट केल्या आहेत. उदयन मजूमदार नावाच्या एका युझरने (@yudi15) म्हटले आहे, आपल्याला अर्थमंत्री बनवायला हवे होते. मला वाटते, की या सरकारला आपल्या सारख्या विद्वानांची अॅलर्जी आहे. जे खरोखरच परिवर्तन करू शकतात. तर एका युझरने (@seas_master) म्हटले आहे, आपल्यासाठी सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे.

गडकरींबाबतचा प्रस्ताव स्वीकारला असता तर... -  तत्पूर्वी, सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, नितीन गडकरींबाबाबतचा माझा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरं झालं असतं. देशात कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढाईची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हातात द्यायला हवी, असा प्रस्ताव मी दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती. पण आता देशातील कोरोनाच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृहमंत्रालय आदेश देत होते. आता सरकारला सुप्रीम कोर्टाचे ऐवकावे लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव आहे, अशी गंभीर टीका करत सुब्रमण्यन स्वामींनी केंद्र सरकारला पुन्हा घरचा आहेर दिला होता.

2 Years of Modi 2.0: कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर जनता खूश, पण मोदी सरकारच्या कृषि कायद्यांबाबत वेगळा कौल!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील - भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर एक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. स्वामी यांच्या दाव्यानुसार देशात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा त्यात लहान मुले, बालके (Childrens) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतील, यासाठी आजच काळजी घ्यावी लागेल, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था