शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

West Bengal Violence: भयावह! बंगालमध्ये हिंसाचार कायम; आणखी एका BJP नेत्याची हत्या, TMC वर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 08:50 IST

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप (BJP) नेत्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील हिंसाचार अद्यापही कायमइटाहार आणखी एका भाजप नेत्यांची हत्या हत्या, हिंसाचारामागे TMC असल्याचा आरोप

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकांनंतर मोठ्या प्रमाणात सुरु झालेला हिंसाचार अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप (BJP) नेत्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विट करून यामागे तृणमूल काँग्रेस (TMC) असल्याचा आरोप केला आहे. 

भाजप युवा मार्चाचे नेते मिथुन घोष यांची उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहार येथे अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिथुन घोष ३२ वर्षांचे होते. यानंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी एक ट्विट करत यामागे तृणमूल काँग्रेस असून, पश्चिम बंगालमधील हिंसाचारालाही जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

भाजप मिथुन घोषचे योगदान कधीही विसरणार नाही

सुवेंदू अधिकारी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, भाजप युवा मोर्चाचे नेते मिथुन घोष यांची इटाहार येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे टीएमसीचा हात आहे. असामाजिक तत्वांनी आपल्या मालकाच्या आदेशावरून ही हत्या घडवून आणली आहे. मिथुन घोष यांचे योगदान भाजप कधीही विसरणार नाही. योग्य वेळ आली की, याला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला. 

दोन हल्लेखोरांची नावे समोर

रविवारी रात्री ११ वाजता मिथुन घोष आपल्या घरासमोर उभे होते. तेव्हा अचानक दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून आल्या आणि घोष यांच्यावर गोळ्या झाडून पसार झाल्या. जखमी अवस्थेतील घोष यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्यामागे सुकुमार घोष आणि संतोष महतो यांची नावे समोर आली आहेत. मृत्यूपूर्वी मिथुन घोष यांनी या दोघांची नावे घेतल्याचा दावा घोष यांचे बंधू अजित घोष यांनी पोलिसांसमोर केला आहे. 

दरम्यान, उत्तर दिनाजपूर भागात यामुळे खळबळ उडाली आहे. मिथुन घोष यांना जीवे मारण्याची धमकी यापूर्वी देण्यात आली होती, असा दावा उत्तर दिनाजपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष बासुदेव सरकार यांनी केला आहे. पोलीस, प्रशासनाकडे तक्रार करूनही यासंदर्भात काही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही सरकार यांनी केला आहे. तसेच टीएमसीने भाजपने केलेले सर्व आरोप आणि दावे फेटाळून लावले आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस