शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा; किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 12:56 IST

राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते असा आरोपही सोमय्यांनी केला

नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काहीही साध्य होत नाही. नील सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारनं नील सोमय्यांची कुठलंही चौकशी करत नसल्याचं सांगितले. उच्च न्यायालयात ठाकरे सरकारनं स्वत:ची इज्जत घालवून घेतली असा टोला भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी(BJP Kirit Somaiya) शिवसेनेला(Shivsena) लगावला.

किरीट सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला ते म्हणाले की, संजय राऊत यांनी नील सोमय्यांविरोधात दिलेल्या कागदपत्रांचे पुढे काय झाले? हायकोर्टाने ठाकरे सरकारला लोटांगण घालावे लागले. नीलवर तुम्ही जो अत्याचार केला त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार असा इशारा त्यांनी शिवसेना आणि संजय राऊतांना दिला. त्याचसोबत राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते असा आरोपही सोमय्यांनी केला.

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार असल्याचं ते म्हणाले. इतकेच नाही तर बाप-बेटा जेलमध्ये जाणार असल्याचंही राऊतांनी दावा केला होता. या आरोपानंतर नील सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज सादर केला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टात दिलेल्या माहितीनंतर सोमय्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सरकारनं हायकोर्टात म्हटलं की, नील सोमय्यांविरोधात कुठलीही प्राथमिक चौकशी सुरू नाही. किंवा वसई निकॉन इन्फ्राचे संचालक असलेल्या नील सोमय्यांवर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीनाची गरज नाही. त्यानंतर नील सोमय्यांनी हायकोर्टातून याचिका मागे घेतली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी वाधवान आणि सोमय्यांच्या संबंधांच्या तारखा मांडल्या. सोमय्या यांनी जून २०१५ मध्ये एचडीआयएल आणि जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. त्यासाठी एमएमआरडीमध्ये सोमय्या यांनी सातत्याने तक्रारी केल्या. पीएमसी बँक आणि पत्राचाळ प्रकरणातील राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून किरीट सोमय्या यांनी पैसे उकळले आहेत. वाधवान विरोधात सोमय्यांनी आरोपांची, तक्रारींची मालिका चालविली होती. पण, २०१६ मध्ये अचानक वाधवान यांच्या विरोधातील तक्रारी थांबल्या आणि त्याच वर्षी नील सोमय्या भागीदार बनले. सिरियल किलर वगैरे असतात तसे सोमय्या हे सिरियल कम्प्लेनर आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला होता.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSanjay Rautसंजय राऊत