शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

हत्या प्रकरणातील आरोपींचं जयंत सिन्हांकडून स्वागत; भाजपा कार्यालयात मिठाई वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 07:32 IST

गोमांसाच्या संशयावरुन जमावानं केली होती तरुणाची हत्या

रामगढ: गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन तरुणाची हत्या करणाऱ्या 8 आरोपींना झारखंड उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सर्व आरोपींचं स्वागत केलं. यावेळी आरोपींना पुष्पहार घालण्यात आले आणि भाजपाच्या कार्यालयात मिठाईचं वाटप करण्यात आलं. यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.हत्या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी माजी आमदार शंकर चौधरी यांनी आंदोलन केलं होतं. आरोपींना जामीन मिळाल्यानंतर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत आनंद व्यक्त केला. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, असं ते म्हणाले. गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरुन अलीमुद्दीन नावाच्या तरुणाची रामगढमध्ये जमावानं हत्या केली होती. या प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हत्याकांडात एक अल्पवयीन मुलाचा समावेश होता. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयात अधिवक्ता बी. एन. त्रिपाठी यांनी सरकारची बाजू मांडली. जमावाकडून अलीमुद्दीनला मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ पुरावा म्हणून स्वीकारण्यास न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे आठजणांना जामीन मंजूर झाला. तर इतर तिघांनी जामिनासाठी अर्ज केला नव्हता. हत्या प्रकरणातील आरोपींची सुटका झाल्यानं माजी आमदार शंकर चौधरींनी आनंद व्यक्त केला. 'अधिवक्ता बी. एन. त्रिपाठी अगदी देवासारखे असून त्यांच्यामुळेच आमच्या 8 भावांना जामीन मिळाला,' असं चौधरी म्हणाले. सर्वांना जामीन मिळाल्यावर रामगढमध्ये भव्य विजयी यात्रा काढू, असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Jayant Sinhaजयंत सिन्हाBJPभाजपा