शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गिरीराज सिंहांनी चक्क नाव बदललं? कारण वाचून म्हणाल, 'अरे देवा'... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:34 IST

जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपिअरने म्हटलं होतं, नावात कायं आहे ? पण नावासाठी आणि नाव मोठं होण्यासाठीचं राजकारण आपण

पाटणा - केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. आपल्या नावासमोर आपले गोत्र जोडणार असल्याची घोषणा गिरीराज सिंह यांनी केली होती. बिहारच्या नवादा मतदारसंघातील खासदार गिरीराज सिंह यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. आपण आपला देश वाचविण्यासाठी नाव बदलत आहोत, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपिअरने म्हटलं होतं, नावात कायं आहे ? पण नावासाठी आणि नाव मोठं होण्यासाठीचं राजकारण आपण नेहमीच पाहतो. आता, भाजप नेते खासदार गिरीराज सिंह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. देश वाचविण्यासाठी सनातनला वाचविणे गरजेचे आहे. तर सनातनला वाचवायचा असल्यास आपण आपल्या ऋषी मुनींच्या मार्गावर चालायला हवं. त्यासाठी आपण आपल्या नावासमोर आपलं गोत्र जोडलं पाहिजे, असे सिंह यांनी म्हटले. तसेच, मी आजपासून माझे नाव ऋषी शांडिल्य यांच्या नावासोबत जोडत आहे. त्यामुळे आता, माझे नाव शांडिल्य गिरीराज सिंह असे आहे, असे ट्विट सिंह यांनी केलं आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावरुन नेहमीच चर्चेत असलेल्या खासदार गिरीराज सिंह यांनी आता स्वत:च्या नावात बदल करुन लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गिरीराज सिंह यांनी 2047 साली पुन्हा एकदा भारताचे विभाजन होणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. 

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार