शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 22:27 IST

"काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील..."

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरून राजकारण जबरदस्त तापताना दिसत आहे. भाजपने शनिवारी (३० नोव्हेंबर २०२४) ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यावरून काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आधी राजीनामा द्यायला हवा. सर्वप्रथम राहुल गांधींनी राजीनामा द्यावा आणि आता बॅलेट पेपर परत आल्यानंतर आपण निवडणूक लढू, अशी घोषणा करायला हवी, असे भाजपने म्हटले आहे.

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, जर काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला, तर ते त्यांच्याकडून उपस्थित केल्या जात असलेल्या मुद्द्याला प्रतिबिंबित करेल. काँग्रेसचे आरोप पोकळ शब्दांशिवाय काहीही नाही. एवढेच नाही तर भाटिया यांनी काँग्रेसला या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचाही सल्ला दिला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षांत, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शिता आणि इलेक्टोरल व्होटिंग मशीनच्या विश्वासार्हतेसंदर्भात अनेक वेळा क्लीन चिट दिली आहे.

काँग्रेस फक्त पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील -भाटीया म्हणाले, “काँग्रेसचे मुख्यमंत्री, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी राजीनामा द्यावा कारण ते त्याच निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले आहेत, ज्यावर विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रियांका गांधी वड्रा यांनी केरळच्या वायनाडमधून नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ घेतली, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. हे "विडंबन" आहे. काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील."

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा