शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 22:27 IST

"काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील..."

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरून राजकारण जबरदस्त तापताना दिसत आहे. भाजपने शनिवारी (३० नोव्हेंबर २०२४) ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यावरून काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आधी राजीनामा द्यायला हवा. सर्वप्रथम राहुल गांधींनी राजीनामा द्यावा आणि आता बॅलेट पेपर परत आल्यानंतर आपण निवडणूक लढू, अशी घोषणा करायला हवी, असे भाजपने म्हटले आहे.

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, जर काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला, तर ते त्यांच्याकडून उपस्थित केल्या जात असलेल्या मुद्द्याला प्रतिबिंबित करेल. काँग्रेसचे आरोप पोकळ शब्दांशिवाय काहीही नाही. एवढेच नाही तर भाटिया यांनी काँग्रेसला या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याचाही सल्ला दिला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षांत, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शिता आणि इलेक्टोरल व्होटिंग मशीनच्या विश्वासार्हतेसंदर्भात अनेक वेळा क्लीन चिट दिली आहे.

काँग्रेस फक्त पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील -भाटीया म्हणाले, “काँग्रेसचे मुख्यमंत्री, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी राजीनामा द्यावा कारण ते त्याच निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले आहेत, ज्यावर विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रियांका गांधी वड्रा यांनी केरळच्या वायनाडमधून नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ घेतली, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. हे "विडंबन" आहे. काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील."

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा