शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

By देवेश फडके | Updated: March 3, 2021 09:33 IST

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. अशातच आता लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी (adhir ranjan choudhary) यांना भाजपकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान होत नाही, त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे पश्चिम बंगालमधील भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअधीर रंजन चौधरी यांना भाजपकडून खुली ऑफरअधीर रंजन चौधरी यांचा काँग्रेसमध्ये अनादर - भाजपचा दावापश्चिम बंगालमधील राजकीय रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची चिन्हे

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. अशातच आता लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी (adhir ranjan choudhary) यांना भाजपकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान होत नाही, त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे पश्चिम बंगालमधील भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. (bjp leader dilip ghosh says we welcomes congress leader adhir ranjan choudhary)

भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी अधीर रंजन चौधरी यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षात अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान केला जात नाही. अधीर रंजन चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी थेट ऑफर दिलीप घोष यांच्याकडून देण्यात आली आहे. 

सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

अधीर रंजन चौधरी यांचे भाजपमध्ये स्वागत

अधीर रंजन हे काँग्रेसमधील बडे नेते आहेत. अशा बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये योग्य सन्मान केला जात नाही. ही चांगले नाही. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अधीर रंजन चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. अधीर बाबू आमचे जुने-जाणते नेते आहेत. राजकारणातील ते वरिष्ठ व्यक्ती आहेत. काँग्रेस त्यांना अपमानित करत आहे, तसेच त्यांचा अनादर केला जात आहे. भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले आहेत. त्यांनी कधीही यावे, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून, त्यात आता मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. प्रक्षोभक विधाने करून सिद्दीकी अनेकदा वादात सापडले आहेत. ‘जी-२३’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण