शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

...तर राहुल गांधींचा खरा धर्म कळेल; भाजपा नेत्याची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 19:30 IST

भारतीय जनता पार्टीच्या केरळमधील प्रदेशाध्यक्षाने काँग्रेस नेत्यांवर टीका करताना केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगात आहे तसे राजकीय नेत्यांच्या भाषणांची पातळी घसरली असल्याचं दिसून येतं आहे. आझम खान, मायावती, योगी आदित्यानाथ यांच्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीच्या केरळमधील प्रदेशाध्यक्षाने काँग्रेस नेत्यांवर टीका करताना केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

अट्टिंगल येथे जाहीर सभेला संबोधित करताना केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्रीधरन पिल्लई यांची जीभ घसरली आहे. पिल्लई यांनी मुस्लिमांची ओळख पटवायची असेल तर त्यांचे कपडे उतरवा अशा अश्लिल शब्दाचा वापर जाहीर सभेत केला. मुस्लिमांमधील खतना प्रथेवरुन त्यांनी हे विधान केल्याचं विरोधकांकडून आरोप केला जात आहे. श्रीधरन पिल्लई हे भाजपा उमेदवार शोभा सुरेंद्रन यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यासाठी अट्टींगलला पोहचले होते. 

यावेळी श्रीधरन पिल्लई यांनी एअर स्ट्राईकवरुन संशय घेणाऱ्या नेत्यांविरोधात हे वादग्रस्त विधान केले आहे. भाषणाच्या ओघामध्ये पिल्लई म्हणाले की, राहुल गांधी, येचुरी आणि पिनारई विजयन यांनी एअर स्ट्राईकनंतर भारतीय जवानांनी किती दहशतवादी मारले असा प्रश्न उपस्थित केला. या लोकांची जाती धर्म ओळखायचा झाला तर ते मुस्लिम असतील तर त्यांच्या शरीरावर काहीतरी निशाण असतीलच. जर तुम्ही या लोकांचे कपडे उतरवले तर सर्वांना माहीत पडेल की हे लोक मुस्लिम आहेत की नाही? असं वादग्रस्त विधान त्यांनी केले.

पिल्लई यांच्या विधानावरुन केरळमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाला बळ मिळालं आहे. सीपीआयने श्रीधरन पिल्लई यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. श्रीधरन पिल्लई यांनी मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्यासाठी असं विधान केले. त्यांच्या घाणेरड्या विचारावरुन त्यांची विचारधारा कळते. निवडणूक आयोगाने पिल्लई यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसने श्रीधरन पिल्लई यांच्या वक्तव्याचा निषेध करत पिल्लई यांनी मुस्लिम समुदायाचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. जर पिल्लई यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा काँग्रेसने केला आहे. 

मात्र श्रीधरन पिल्लई यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे, मी कोणत्याही प्रकारचं वादग्रस्त विधान केले नाही. जर माझ्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तर कायदेशीर कारवाई करेन कारण मी कोणावरही अश्लिल टिप्पणी केली नसल्याचा स्पष्टीकरण श्रीधरन पिल्लई यांनी दिलंआहे.    

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग