शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होत आहे आदिवासी महिलेचा सन्मान: जेपी नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 06:25 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे.

काही दिवसांतच आपल्या प्रजासत्ताकाची धुरा एका नव्या राष्ट्रपतींच्या हाती असेल आणि या प्रतिष्ठेच्या पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला संपूर्ण देश कशा प्रकारे पसंती दर्शवत आहे ते आपण सर्व सध्या पाहत आहोत. द्रौपदी मुर्मू या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती असतील. अनेक दशकांपासून आपल्या देशात घराणेशाहीचे राजकारण आणि वैयक्तिक संपत्ती यांचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांची वाटचाल चैतन्यदायी ताज्या हवेचा प्रवाह म्हणावा लागेल. ओडिशामध्ये रायरंगपूर येथे त्यांनी एक शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर सिंचन विभागात कनिष्ठ सहायक म्हणून रुजू झाल्या.

तळागाळापासून सुरुवात करत १९९७ मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली आणि त्या रायरंगपूर नगर पंचायतीमध्ये पंचायत सदस्य बनल्या. तीन वर्षांनी त्यांनी रायरंगपूरमधून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. २०१५  मध्ये त्यांनी  झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल तसेच एखाद्या  राज्याच्या राज्यपाल झालेल्या ओडिशातल्या  पहिल्या आदिवासी महिला नेत्या म्हणून शपथ घेण्याचा बहुमान मिळवला. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या यशावर  वैयक्तिक शोकांतिकेचे सावट होते. त्यांचे पती आणि मुलांचे निधन झाले. या संकटांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरित केले. 

लोकशाही राष्ट्रांची उभारणी केवळ सरकारे आणि संस्थांद्वारे होत नाही तर ती जनता करते. गेल्या ८ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. जेव्हा महामारी आली तेव्हा ८० कोटी लोकांना कित्येक  महिने मोफत अन्नधान्य दिले गेले. लसीकरण अंतर्गत २०० कोटी मात्रा दिल्यामुळे  कोविड विरुद्धचा जागतिक लढा अधिक मजबूत झाला आहे. 

आमचे बहुतांश सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार हे मध्यमवर्गीय  पार्श्वभूमीतून आले   आहेत. केंद्र सरकार खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या दूरदृष्टीला, त्यांच्या संकल्पनांना न्याय देत आपला कारभार करत आहे. 

भाजपचा अध्यक्ष या नात्याने देशभरातील प्रत्येक राजकीय नेत्यांना आणि पक्षांना, मतदार गणाच्या प्रत्येक सदस्याला (इलेक्टोरल कॉलेजच्या प्रत्येक सदस्याला) आणि प्रत्येक भारतीयाला माझे कळकळीचे आवाहन आहे की, त्यांनी राजकीय मतभेद दूर ठेवावेत आणि सद्सद्विवेकबुद्धीने तुम्हाला आतून जे वाटतेय त्याला प्रतिसाद देत सन्मानीय द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. खरे तर सामाजिक न्याय आणि सामाजिक परिवर्तनाच्या आपल्या वाटचालीतला हा सर्वात गौरवशाली क्षण आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण तो गमावता कामा नये. कारण ही निवडणूक ‘लोकांचा राष्ट्रपती’ (‘पीपल्स प्रेसिडेंट’) निवडण्यासाठीची  निवडणूक आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवे.

राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आदिवासी समाजातून आलेल्या एका कर्तबगार महिलेला या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी मिळत असल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. यापुढे एक महिला आपल्या देशाच्या राष्ट्रपतिपदावर विराजमान होणार आहे ही भावना महिलांनादेखील अधिक सक्षम करणारी आहे.

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डा